शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:11 IST

अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे.

ठळक मुद्देएका नाल्याच्या वादातून गुंडांकडून महिलेला मारहाण प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने महिला आणि तिच्या मुलीने पेटवून घेतले. सध्या दोघींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु, आईची प्रकृती गंभीर

लखनऊ – अमेठी जिल्ह्यातील एक महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अनेकदा पोलीस कार्यालयाबाहेर चक्करा घातल्या पण कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा महिलेचा आरोप आहे.

माहितीनुसार, अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. सध्या या महिलेची स्थिती गंभीर आहे. अमेठीत एका नाल्याच्या विवादातून काही लोकांनी महिलेला जबरदस्ती मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतरही त्या लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांना मारहाण केली. तसेच पीडित महिलेला अपघात करुन तिचं खोटं नाव टाकू अशी धमकीही दिली. या प्रकरणावर सुनावणी होत नसल्याने महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी लखनऊ येथे पोहचून मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी पोहचली.

मागील एक महिन्यापासून आई आणि मुलगी फेऱ्या घालत आहेत. त्यांची मंत्र्याची भेट झाली पण दोघींनीही लोकभवनच्या बाहेर येऊन स्वत:पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या दोन्ही महिलांवर उपचार सुरु आहेत. पीडित महिला गुडियाने सांगितले की, आमच्या येथील नाल्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली. त्यानंतर सुनावणी होत नव्हती. काही गुंड आम्हाला धमक्या देऊ लागले. त्यांनी आम्हाला मारहाणही केली. असे असूनही कारवाई झाली नाही असा आरोप तिने केला.

याबाबत एडिशनल डीसीपी चिरंजीव सिन्हा यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही महिलांना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं वाचवलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हजरतगंज पोलीसही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर पोहचले होते. मात्र या प्रकरणावरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे की, लखनऊमध्ये लोकभवनसमोर दोन महिलांनी गुंडाविरोधात कारवाई होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, हा प्रकार दुर्दैवी आहे. समाजवादी पक्षाने लोकभवन यासाठी बनवलं होतं कारण कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. गरिबांच्या समस्या सोडवल्या जातील. मात्र भाजपा सरकारमध्ये गरीबांचे कोणीही ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक

लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

 कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव