शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:11 IST

अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे.

ठळक मुद्देएका नाल्याच्या वादातून गुंडांकडून महिलेला मारहाण प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने महिला आणि तिच्या मुलीने पेटवून घेतले. सध्या दोघींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु, आईची प्रकृती गंभीर

लखनऊ – अमेठी जिल्ह्यातील एक महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अनेकदा पोलीस कार्यालयाबाहेर चक्करा घातल्या पण कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा महिलेचा आरोप आहे.

माहितीनुसार, अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. सध्या या महिलेची स्थिती गंभीर आहे. अमेठीत एका नाल्याच्या विवादातून काही लोकांनी महिलेला जबरदस्ती मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतरही त्या लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांना मारहाण केली. तसेच पीडित महिलेला अपघात करुन तिचं खोटं नाव टाकू अशी धमकीही दिली. या प्रकरणावर सुनावणी होत नसल्याने महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी लखनऊ येथे पोहचून मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी पोहचली.

मागील एक महिन्यापासून आई आणि मुलगी फेऱ्या घालत आहेत. त्यांची मंत्र्याची भेट झाली पण दोघींनीही लोकभवनच्या बाहेर येऊन स्वत:पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या दोन्ही महिलांवर उपचार सुरु आहेत. पीडित महिला गुडियाने सांगितले की, आमच्या येथील नाल्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली. त्यानंतर सुनावणी होत नव्हती. काही गुंड आम्हाला धमक्या देऊ लागले. त्यांनी आम्हाला मारहाणही केली. असे असूनही कारवाई झाली नाही असा आरोप तिने केला.

याबाबत एडिशनल डीसीपी चिरंजीव सिन्हा यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही महिलांना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं वाचवलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हजरतगंज पोलीसही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर पोहचले होते. मात्र या प्रकरणावरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे की, लखनऊमध्ये लोकभवनसमोर दोन महिलांनी गुंडाविरोधात कारवाई होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, हा प्रकार दुर्दैवी आहे. समाजवादी पक्षाने लोकभवन यासाठी बनवलं होतं कारण कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. गरिबांच्या समस्या सोडवल्या जातील. मात्र भाजपा सरकारमध्ये गरीबांचे कोणीही ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक

लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

 कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव