शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महिलेने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, त्याआधी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 12:18 IST

ही घटना आग्र्याच्या विद्यापुरम कॉलनीतील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी साधारण १० वाजता महिलेने आपल्या राहत्या घरी देशी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली.

उत्तर प्रदेशच्या आग्रामधून एक दु:खद घटना समोर आली आहे. इथे एका महिले स्वत:च छातीवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला दोन मुलं आहेत. हे धक्कादायक पाउल उचलण्याआधी महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने तीन पानांची एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तिने 'घरामधील महिलांची सुरक्षा' सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. हे पत्र तिने तिच्या घरातील सदस्यांचा फोनवर पाठवलं होतं.

ही घटना आग्र्याच्या विद्यापुरम कॉलनीतील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी साधारण १० वाजता महिलेने आपल्या राहत्या घरी देशी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. महिलेचं नाव मोना द्विवेदी असून तिचं वय ३० आहे. रिपोर्ट्सनुसार, महिलेने स्वत:ला रूममध्ये बंद करून घेतलं होतं आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून परिवारातील इतर महिला दरवाजा तोडून आत शिरल्या. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्या हैराण झाल्या. त्यांना महिला रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे लिहिलेलं पत्र नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यात तिने घरात राहणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती करत पतीचे भाऊ पंकज आणि अनुजवर मारहाण करण्याचे आणि हे गंभीर पाउल उचलण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

महिलेने पत्रात लिहिले की, 'अनुज आणि पंकज जे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यांनी मला मारहाण केली. कारण मी एक गरीब परिवारातून आहे. माझ्या आईचं निधन मी लहान असतानाच झालं होतं आणि माझे वडील दारोडे आहेत. त्यांनी मला आपली दुर्दशा कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धकमी दिली'. तिने लिहिले की, 'जेव्हा ती १६ वर्षांची होती तेव्हा तिचं लग्न झालं होतं. सासरचे लोक तिला सतत त्रास देत होते. पण ती त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू शकली नाही. कारण तिला तिचा पती सोडेल याची भीती होती.

याप्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, सुरूवातीच्या चौकशीतून असं समोर आलं आहे की, महिलेने आत्महत्या केली. पोलिसांनुसार, काही कौटुंबिक वाद होता आणि तिचे दीर तिला अनेक गोष्टींवरून सतत टोमणे मारत होते. याला कंटाळून तिने आत्महत्या केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीNarendra Modiनरेंद्र मोदी