शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पत्नीची गळा आवळून हत्या ; आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:46 IST

निवृत्ती बाळाजी सोळंकी हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील कोलारा येथे १९ मेच्या सकाळी उघडकीस आली आहे. पार्वती निवृत्ती सोळंकी (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.निवृत्ती बाळाजी सोळंकीहा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा. १८ मे रोजी गावातील नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे पार्वती सोळंकी तिथे आपल्या मुला समवेत स्वयंपाकासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या जेवण करून परत आल्या होत्या. निवृत्तीही तेथूनच जेवण करून आला होता. मात्र रात्री त्याने नानमुखाच्या कार्यक्रमाला मला न विचारता का गेली, अशी विचारणा सुरू केली. सोबतच पत्नीस वायरने मारहाण केली. लहान मुलाने मध्यस्थी करून भांडण सोडविले. मात्र निवृत्तीने भांडण सुरच ठेवल्याने रात्री गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किसन सोळंकी यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांना समजावून सांगत वाद मिटवला. मोठा मुलगा रामेश्वर हा काही महिन्यापासून आतेबहिणीकडे गेलेला असल्याने सासू सुभद्रा या आपल्या लेकीकडे गेलेल्या असल्याने घरात पती-पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघेच जण होते. दरम्यान रात्री मुलगा झोपी गेल्यानंतर निवृत्तीने पत्नीचा वायरच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. सकाळी आई उठत नसल्याचे पाहून मुलाने शेजारच्यांना बोलावून आणेले तेव्हा पार्वती मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळालनंतर पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी निवृत्ती सोळंकी यास अटक केली. विठोबा साहेबराव परीहार (भालगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निवृत्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास चिखली पोलिस करत आहे.यापूर्वीही पोलिसांत दाखल झाली होती तक्रार या प्रकरणातील मृत महिलेचा पती निवृत्ती सोळंकी यास दारूचे व्यसन आहे. तसेच तो चारित्र्याच्या संशयावरून नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. गत ५ फेब्रुवारी २०२० रोजी देखील त्याने मारहाण, शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने पोलीसांत तक्रार दाखल करून बहीणीला माहेरी नेले होते. मात्र, त्यावेळी पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून आरोपीने घरी परत नेले होते. मृत महिलेला दोन मुले व एक १९ वर्षांची मुलगी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी