Sonam Raghuvanshi News: राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांनी सोनम सापडली. शिलाँगमधून बेपत्ता झालेली सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये होती. वाराणसी-गाजीपूर मुख्य रस्त्यावर असलेल्या काशी ढाब्यावर ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. राजाच्या हत्येच्या प्रकरणात तिला अटक केली आहे. पण, सोनमचे वडील देवी सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोनमला अटक करण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनमचे वडील देवी सिंह म्हणाले, "लग्न दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने आणि त्या दोघांच्या (राजा आणि सोनम) यांच्या सहमतीनेच झाली होती. तिथले (मेघालय) जे सरकार आहे, ते पहिल्या दिवसापासूनच खोटं बोलत आहे. चुकीचे माहिती देत आहे. अटक करण्यात आलेले तिघे कुठले आहेत, हे तिथल्या सरकारने सांगायला हवे", असे सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह म्हणाले.
वाचा >>हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
"माझी मुलगी गाजीपूरमध्ये रात्री आली आणि तिने तिथल्या ढाबेवाल्याच्या मोबाईलवरून तिच्या भावाला कॉल केला. ती रडली आणि त्यानंतर ढाबेवाल्याने तिला मोबाईल दिला. तिने भाऊ गोविंदला कॉल केला. गोविंदने रात्री कॉल केला, तर तोपर्यंत पोलीस त्या ढाब्यावर पोहोचले होते. ते तिला घेऊन आले", असे देवी सिंह यांनी सांगितले.
"माझे सोनमसोबत बोलणे झाले नाही. गोविंदचे तिच्यासोबत बोलणे झाले. त्याने मला सांगितलं की, सोनम सापडली आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. मी निघतोय. गोविंद आता गाजीपूरला पोहोचेन", असेही ते म्हणाले.
पैसे देऊन हत्या का करेल?
पैसे देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप सोनमच्या वडिलांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, "आम्ही ही गोष्ट का करू? आमची मुलगीही असे का करेल? असं करायचं असतं, तर ती फिरायला कशाला गेली असती? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अमित शाहांची भेट घेऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार आहोत", असे देवी सिंह म्हणाले.
अमित शाहांकडे सोनमच्या वडिलांची मागणी
"माझी अमित शाह यांना विनंती आहे की, सीबीआयची चौकशी करावी. पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. सगळे पोलीस ठाणे कोठडीत जाईल. तिथले पोलीस खोटं बोलत आहे. माझी मुलगी स्वतः गाजीपूरला आली. ती कशी पोहोचली तिलाच माहिती. तिने ढाब्यावाल्याकडून मोबाईल घेऊन कॉल केला", अशी मागणी त्यांनी केली.