शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:49 IST

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."

ग्रेटर नोएडा येथील हुंड्याच्या बळी ठरलेल्या निक्की भाटी हिला जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर, तिच्या वडिलांचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवत आहे. भिखारी सिंह यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना सांगितले, "आम्ही आमच्या कुवतीपेक्षा जास्त देऊन मुलींची लग्ने केली. स्कॉर्पियो, बुलेट, रोख रक्कम... एका शेतकऱ्याला जे काही शक्य आहे, ते सर्व आम्ही केले." समाजाने घालून दिलेल्या परंपरेचे पालन करत मुलींच्या आनंदासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सासरच्या मंडळींच्या लोभीपणाने आणि क्रूरतेने त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले.

मुलींच्या आनंदासाठी आम्ही सर्व काही केले!वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलींना नेहमीच चांगले जीवन देण्याचा प्रयत्न केला. "आम्ही तिला कधीही बसमध्ये लटकू दिले नाही. नेहमी आमच्या गाडीतून पाठवले. डीपीएसमधून शिकवले. मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले. पण ज्या घरात त्यांनी मुलींना पाठवले, तिथून त्यांना केवळ वेदनाच मिळाल्या."

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."

म्हणून पुन्हा मुलींना सासरी पाठवले!परिस्थिती बिघडल्यावर अनेकदा त्यांनी मुलींना माहेरी बोलावले होते. "आम्ही आमच्या मुलींना घरी घेऊन आलो होतो, पण समाजाने आणि पंचायतीने हस्तक्षेप केला आणि मुलींना परत सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला." परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांना होती, पण सासरच्या लोकांच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. निक्कीच्या सासूच्या वागणुकीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "निक्कीची सासू तिचे केस ओढायची आणि मुलाकडून तिला मारहाण करायला लावायची. अशी आई मी पहिल्यांदाच पाहिली. एक आई असे कसे करू शकते?" असे ते म्हणाले.

एकाच घरात दोन मुलींची लग्ने का केली?दोन मुलींची लग्ने एकाच घरात का केली, या प्रश्नावर भिखारी सिंह म्हणाले, "त्यांच्याकडे दोन मुले होती आणि आमच्याकडे दोन मुली. घर लहान होते, म्हणून दोन्ही बहिणी सोबत राहतील आणि आनंदी राहतील, असा विचार आम्ही केला. पण असे काही होईल, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. आम्ही मुलींच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न पाहिले होते, पण ते स्वप्न तुटले."

लग्नानंतरही हुंड्याची मागणी थांबली नाही. "आधी स्कॉर्पियो आणि बुलेट घेतली. नंतर कधी मर्सिडीज मागितली, तर कधी लाखोंची रोख रक्कम. त्यांनी ३६ लाख रुपयांची मागणीही केली होती. आमच्या मुली पार्लर चालवत होत्या, तिथूनही ते पैसे चोरू लागले. कोणतेही कामधंदा नाही, फक्त पैशांसाठी दबाव टाकायचे."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारdelhiदिल्ली