शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

स्वत:चं 'कल्याण' करण्याचा मोह नडला; लाच घेताना तहसिलदारासह शिपायाला रंगेहाथ पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:35 IST

काही दिवसांपूर्वी  केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सुद्धा लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता मात्र हा सापळा  यशस्वी न झाल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात रंगली आहे

कल्याण - कल्याण-डोंबिवली शहर कायम वादग्रस्त चर्चेत राहिली आहेत ती  प्रामुख्याने लाचेच्या प्रकरणामुळे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो की कल्याण तहसील कार्यालय शिपाई - लिपिकापासून ते वरिष्ठ अधिका-यांपर्यंत सर्वांच्याच खाबूगिरीची प्रकरण अनेकदा समोर आली आहेत. आता पुन्हा एकदा कल्याण शहर अशाच एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. कारण सोमवारी कल्याणच्या तहसीलदारांनाच लाच घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे लाचलुचपत  विभागाने 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदार दीपक आकडे यांच्यासह शिपाई मनोहर हरड हे अलगदपणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.  

तक्रारदार यांच्या  बांधकाम कंपनीने  कल्याण नजीक असलेल्या वरप  येथे घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरिल  सुनावनीचे निकालपत्र  देण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी पडताळणी दरम्यान  लोकसेवक  तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत: करिता 1 लाख  रुपये लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यासाठी सांगितली. तसेच लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड यांनी स्वत: करिता व स्टाफ करिता 20 हजार  रुपये लाचेची मागणी केली.  त्यावरुन सोमवारी ( 30 ऑगस्ट)  रोजी सापळा कारवाई दरम्यान हरड याने आकडे यांच्याकरिता 1 लाख रूपये व स्वतःकरीता 20 हजार -रूपये असे एकूण 1लाख 20 हजार  रूपयांची लाच  स्वीकारल्यानंतर  या दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांनी पकडले.  

दरम्यान काही दिवसांपूर्वी  केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सुद्धा लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता मात्र हा सापळा  यशस्वी न झाल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात रंगली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालय , या कार्यालयांच्या परिसरात वावरणारे दलाल  एकूणच या कार्यालयांभोवती  शिपाई ते अधिका-यांपर्यंत फिरणारे अर्थचक्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. थोडक्यात काय तर साधा एक कागद पुढच्या टेबलवर सरकवायचा असेल तर अगदी 200 -500 रुपयांपासून ते लाखो रुपयांचे  तोडपाणी केलं जातं. "लक्ष्मीदर्शन " घेऊन आपला खिसा गरम  केल्याशिवाय सरकारी कार्यालयात कामं होत नाही ही  आता नागरिकांची देखील मानसिकता झाली आहे. तर  " चहा पेक्षा किटली गरम " असाच काहीसा रुबाब  सरकारी कार्यालयात बहुतांश शिपायांकडे पाहील्यावर लक्षात येत कारण अशा ठिकाणी साहेबांपेक्षा शिपायांनाच जास्त डिमांड का  दिला जातो?. हे आता नागरिकांना देखील चांगलंच समजलं आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण