शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
4
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
5
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
6
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
7
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
8
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
9
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
10
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
11
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
12
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
13
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
14
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
15
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
16
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
17
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
18
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
19
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
20
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Daily Top 2Weekly Top 5

इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:58 IST

एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तब्बल १९ तुकडे करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तुकडा १९ वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आला.

Crime News Karnataka : कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून जवळपास १०० किमी अंतरावर तुमकुरु जिल्हा आहे. त्यातल्या चिंपुगनहल्ली येथे एक अशी रक्तरंजित घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली आहे. या परिसरात एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तब्बल १९ तुकडे करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तुकडा १९ वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आला. पोलिसांनी आता या हत्येचा उलगडा केला आहे. या प्रकरणात महिलेच्या जावयासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

चिंपुगनहल्ली येथेच या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना सापडले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे स्पष्ट केले होते की, हा मृतदेह एका महिलेचा आहे. त्या महिलेच्या शरीराच्या तुकड्यांवर दागिने तसेच असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी ही शक्यता नाहीशी झाली. यानंतर, पोलिसांनी परिसरातील बेपत्ता महिलांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. एसपी अशोक केव्ही यांनी या प्रकरणात अनेक पथके तैनात केली होती.

या तपासादरम्यान पोलिसांना कळले की बेल्लावी येथील रहिवासी ४२ वर्षीय लक्ष्मीदेवम्मा बेपत्ता आहेत. त्यांचे पती बसवराज यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही महिला ३ ऑगस्ट रोजी हनुमंतपुरा येथील त्यांची मुलगी तेजस्वीच्या घरातून बाहेर पडताना शेवटची दिसली होती. सुरुवातीला पोलिसांना फक्त शरीराचे काही अवयव सापडले होते, पण डोके सापडले नाही. पुढील तपासादरम्यान त्यांना महिलेचे डोकेही सापडले. लक्ष्मीदेवम्मा यांच्या पतीने मृतदेहाची ओळख पटवली.

पोलीस पथकाला ३ ऑगस्ट रोजीच एक पांढऱ्या रंगाची मिनी एसयूव्ही हनुमंतपुरा येथून कोरतागेरेला गेल्याचे आढळून आले. तपास केल्यावर असे दिसून आले की दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या होत्या. मूळ क्रमांकाची तपासणी करून, पोलीस उर्डीगेरे गावातील शेतकरी सतीश यांच्यापर्यंत पोहोचले. फोन रेकॉर्ड तपासताना असे दिसून आले की लक्ष्मीदेवीअम्मा गायब झाल्याच्या दिवशी सतीशचा फोन बंद होता आणि दुसऱ्या दिवशीही बंद होता.

अहवालानुसार, खबऱ्यांनी पोलिसांना सांगितले की ३ आणि ४ ऑगस्ट रोजी सतीशच्या शेतात एसयूव्ही दिसली होती. पोलिसांनी सतीशला पोलीस स्टेशनला बोलावले तेव्हा तो चिंगमालुरुमध्ये होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला किरण नावाच्या एका साथीदारासह होरानाडू मंदिरात पकडले. सुरुवातीला दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचा दावा केला.

गाडीतून मिळाले महत्त्वाचे पुरावे!

पोलिसांनी गाडीची माहिती काढली तेव्हा असे आढळून आले की ती ६ महिन्यांपूर्वी डॉ. रामचंद्रय्या एस. यांनी खरेदी केली होती. ती सतीशच्या नावाने खरेदी केली होती, जेणेकरून कोणताही संशय येऊ नये. तपासात असे दिसून आले की डॉ. रामचंद्रय्या यांनी मृत महिलेची मुलगी तेजस्वीशी लग्न केले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही डॉक्टरांना सतीश आणि किरण यांच्याशी समोरासमोर बोलावले. आम्ही त्यांना समोरासमोर बसवले आणि त्यांची चौकशी केली. त्यानंतर सतीश काहीही लपवू शकला नाही आणि काही वेळातच इतर दोघांनीही सर्व काही कबूल केले.

हत्येमागील कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, डॉ. रामचंद्रय्या यांनी या महिलेच्या मुलीशी दुसरे लग्न केले होते. मात्र, या महिलेला हे लग्न मान्य नव्हते. कारण, रामचंद्रय्याचे आधीच एक लग्न झाले होते आणि त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. इतकंच नाही तर, त्यांच्या मुलीच्या वयात तब्बल २० वर्षांचे अंतर होते. रामचंद्रय्या यांना भीती होती की लक्ष्मीदेवम्मा त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करतील. अशा परिस्थितीत, त्यांनी घटनेच्या ६ महिने आधीपासून नियोजन सुरू केले. त्यांनी सतीशच्या नावाने एक कार खरेदी केली आणि सतीश आणि किरण यांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दोघांनाही अ‍ॅडव्हान्स म्हणून ५०,००० रुपयेही दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, सतीश हा रामचंद्रय्याचा रुग्ण होता आणि त्याच्या घराजवळ राहत होता. पोलिसांनी सांगितले की किरण हा सतीशचा चुलत भाऊ आहे.३ ऑगस्ट रोजी, लक्ष्मीदेवम्मा तिच्या मुलीच्या घरून परत येत असताना, रामचंद्रय्या यांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन देऊन लिफ्ट दिली. सतीश आणि किरण देखील गाडीत होते. महिला बसताच दोघांनीही तिचा गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी, मृतदेह धारदार शस्त्रांनी कापण्यात आला आणि त्याचे तुकडे १९ ठिकाणी फेकण्यात आले. यापूर्वी, हे प्रकरण मानवी बलिदानाशी देखील जोडले जात होते. परंतु एसपी अशोक यांनी ही हत्या मानवी बलिदानाशी संबंधित असल्याच्या वृत्तांना नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक