शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

जे कुणाला जमले नाही ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविले, देशात कुप्रसिद्ध असलेल्या ईराणी गॅंगचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 20:04 IST

Crime News : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

वर्धा : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या ‘इराणी’ गॅंगचा राज्यातील पोलीस विभाग शोध घेत होती. मात्र, आरोपींना पकडण्यात यश मिळत नव्हते. मात्र, वर्धा शहरात या गॅंग कडून दोन घटना घडताच वर्धा पोलीस दल ‘अॅक्टीव्ह’ झाले अन् ‘इराणी’ गॅंगच्या शोधात निघाले. आपल्या जिवाची पर्वा न करता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी आणि शहर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर ‘इराणी’ गॅंगचा पर्दाफाश केला. जे कुणाला जमले नाही अखेर ते वर्धा पोलिसांनी करुन दाखविल्याने वर्धा पोलिसांची छाती ५६ इंच फुगली, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. पोलिसांनी अटक केलेल्यात अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी , शेख शाहरुख रईस रा. नायकवाडी जि. अहमदनगर, रियाज रशिद शेख रा. विहा मांडवा जि. औरंगाबाद, अविनाश लक्ष्मण गायकवाड रा. शेवगांव जि. औरंगाबाद यांचा समावेश आहे.

ईराणी टाेळीतील आरोपी हे तोतया पोलीस सांगून सामान्यांना लूटण्याचा गोरखधंदा करतात. या टोळीची नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागात वस्ती आहे. या टोळीतील आरोपी खासगी वाहनं घेऊन नागपूरच्या उपनगरात ठिय्या देतात आणि तेथूनच इतर जिल्ह्यात जाऊन गुन्हे करतात. संपूर्ण देशात या टोळीचा शोध पोलीस घेत होते. मात्र, पोलिसांच्या गळाला ही टोळी सापडलेली नव्हती. वर्धा शहरात दोन घटनांत आरोपींनी तोतया पोलीस सांगून वृद्धांना लूटल्याने ही टोळी वर्धा पोलिसांच्या रेकॉर्डवर आली अन् पोलिसांनी लगेच दखल घेत टोळीचा पर्दाफाश करुन टोळीतील आरोपींना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता १८ रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बलात्कार प्रकरणी राजस्थानच्या मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस जयपूरमध्ये दाखल

असा देतात गुन्ह्यांना ‘अंजाम’

ईराणी टोळीतील आरोपींचा नागपूर येथील उपनगरात ठिय्या होता. ते रायपूर, मध्यप्रदेश, धुळे, शिरपूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होत होते. दाखल होताच जिल्ह्यात चोरीला अंजाम देत होते.

जिवावर उदार होऊन केली धरपकड

ईराणी टोळी ही देशात कुप्रसिद्ध आहे. या टोळीचा सर्वच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा शोध घेत होती. यापूर्वीही टोळीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर टोळीतील आरोपींनी हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी जिवावर उदार होत आरोपींना बेड्या ठोकल्या. 

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यताईराणी गॅंगची दहशत होती. या गॅंगचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस यंत्रणा अर्लट होती. मात्र, विदर्भात या गॅंगला पकडण्यात यश येत नव्हते. अखेर वर्धा पोलिसांनी एक रात्र श्रीरामपूर येथे राहून संपूर्ण परिसर पिंजून काढत तसेच आरोपींच्या घरांची माहिती गोळा करुन जिवाची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पारधी गॅंग नंतर दुसऱ्या मोठ्या गॅंगला पकडण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरी