शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

वाराणसीत दिवसाढवळ्या एन्काऊंटर! दोन डझनहून अधिक गुन्हे अन् २ लाखांचं बक्षिस असलेल्या गुंडाचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:33 IST

उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुन्हेगाऱ्यांचा काळ्या कमाईवर बुल्डोजर चालवल्यानंतर आता फरार आरोपींचा थेट एन्काऊंटर करण्यास सुरुवात झाली आहे. वाराणसीत दिवसाढवळ्या २ लाखांचं बक्षीस असलेल्या गुंड मनीष सिंह सोनू याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. 

मनीष सिंह सोनू याच्यावर दोन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्याचा अखेर आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं खात्मा केला आहे. एनडी तिवारी हत्याकांडासह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मनीष सिंह सोनू याचा सहभाग होता. त्याच्यावर जौनपूर, गाजीपूर, वाराणसी आणि चंदौली येथे एकूण मिळून दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून होता फरारमनीष सिंह सोनूचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस स्वरुपात दोन लाख रुपये दिले जातील असं अलिकडेच जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता. २८ ऑगस्ट २०२० रोजी मनिष सिंह यानं चौकाघाट येथे दिवसाढवळ्या हिस्ट्रीशीटर अभिषेक सिंह प्रिंस यांच्यासह दोन जणांची हत्या केली होती. याआधी मनिष सिंह आझमगढ येथील एका सराफा व्यावसायिकाची लूटमार आणि खून प्रकरणात फरार होता. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये मिर्झापूरच्या चुनार येथील कंपनी अधिकाऱ्याकडून खंडणी व हत्येच्या प्रकरणात मनीष सिंग सोनूचे नाव समोर आले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिसांनी मनिषला जैतपुरा परिसरात घेरलं होतं. या चकमकीत रोशन गुप्ता उर्फ ​​बाबू उर्फ ​​किट्टू मारला गेला, तर मनीष पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

सोनू बिहार आणि नेपाळमध्ये लपून बसत होतानोव्हेंबर २०२० नंतर पोलीस सोनू याचा मागोवा घेत होते. पण तो काही हाती लागत नव्हता. यूपी पोलिसांच्या माहितीनुसार, मनिष बिहार आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. तो सातत्यानं त्याचं ठिकाण बदलत होता. जवळपास दीड वर्षांनंतर पोलिसांना मिळालेल्या टिपनुसार सोनू आज वाराणसीत असल्याचं कळलं. 

STF नं दिवसाढवळ्या केला एन्काऊंटरसोनूची माहिती मिळताच यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं त्याला घेरलं. यावेळी मनिष सिंह यानं पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तो गोळीबारात ठार झाला. त्याच्याकडून ९ एमएम कारबाइन, ३२ बोर ची पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात भाजपा सरकारचं पुनरागमनानंतरचा हा पहिलाच मोठा एन्काऊंटर आहे. ज्यात एक मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ