शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:07 IST

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये आता योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा धाक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. मैनपुरीमध्ये दोन दरोडेखोर पोलिसांसमोर शरण आले आहेत.

मैनपुरी-

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये आता योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा धाक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. मैनपुरीमध्ये दोन दरोडेखोर पोलिसांसमोर शरण आले आहेत. दोन्ही दरोडेखोर आत्मसमर्पण करण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचले होते. मैनपूरमध्ये पकडलेल्या या चोरांच्या हातात बॅनरही होते. 'पोलीस आमचे एन्काउंटर करतील. आम्हाला वाचवा', 'आम्ही दरोडेखोर आहोत, आम्हाला तुरुंगात पाठवा', असे पोस्टरवर लिहून चोर पोलिसांना शरण आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मैनपुरीच्या किश्नी भागात दरोडा टाकला होता. तेव्हापासून पोलीस आणि तपास पथक त्यांच्या मागावर होते. उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या २.० मध्ये प्रशासनाचा धाक दाखवणारे हे चित्र असल्याचे बोलले जात आहे. 

योगी २.० मध्ये बुलडोझरचीही भीतीयोगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये आता बुलडोझरची भीतीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सरकार स्थापन झाल्यानंतर १४ दिवसांत बुलडोझरच्या भीतीने ५० हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात आरोपी फरार होता, मात्र त्याच्या घराबाहेर बुलडोझर पोहोचताच आरोपीने आत्मसमर्पण केले.

युपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर सतत पळ काढत असतो. कायदेशीर प्रक्रिया आणि वॉरंटनंतरही जेव्हा गुन्हेगार शरण येत नाही, तेव्हा त्याच्या गुन्ह्यातून कमावलेल्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश घेऊन बुलडोझर चालवण्याची कारवाई केली जाते. यूपीच्या ADG कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, यासाठी गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता बनवणे आवश्यक आहे. तरच कारवाई केली जाते.

शामलीमध्ये १७ गुन्हेगांनी केलं आत्मसमर्पणयूपीमध्ये योगी सरकार परतल्यानंतर शामलीमध्ये चकमकीच्या भीतीने २३ मार्च रोजी सुमारे १८ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. शामली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या १८ गुन्हेगारांमध्ये अनेक गुंड आणि गाय तस्करांचा समावेश होता. पोलिसांसमोर कधीही गुन्हा करणार नाही, अशी शपथही या चोरट्यांनी घेतली होती. या सर्व गुन्हेगारांनी आत्मसमर्पण करत पोलीस स्टेशन गाठले आणि एसएचओसमोर हजर झाल्यानंतर आत्मसमर्पण केले. पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलेल्या गुन्हेगारांमध्ये सनवर, मंजूर हसन, उम्मेद, मशरूफ, अकबर, सलीम, नौशाद, ताहिर, सुहेब, गुलबहार, मुस्तकीम, मेहराब, नौशाद, सलीम, इंतेझार, शहजाद, अब्दुलगनी आणि नौशाद यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ