शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतात दूध आणण्यासाठी गेला, समोरील दृश्य पाहून तो हादरला; यवतमाळमधील भयावह घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:20 IST

अशोक अक्कलवार यांचे कळमनेर शिवारात शेत आहे.

यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगडी वरवंटा टाकून खून केला. ही गंभीर घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. दरम्यान, कळंब तालुक्यातही सोमवारी ८.३० वाजता इंदिरा चौकात युवकाची हत्या करण्यात आली. जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

अशोक धनंजय अक्कलवार (६५) रा. शांतीनगर, राळेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक अक्कलवार यांचे कळमनेर शिवारात शेत आहे. त्या शेतातील बंड्यात ते नेहमी जागल करण्यासाठी जात होते. रविवारी रात्री ते शेतात जागल करण्यासाठी गेले. सकाळी ८ वाजता त्यांचा मुलगा समीर शेतातून दूध आणण्यासाठी तेथे गेला. मात्र, त्या ठिकाणचे दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला. 

समीरचे वडील रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडून होते. कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी दगडी वरवंटा अशोक अक्कलवार यांच्या डोक्यात घातला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून हादरलेल्या समीरने धीर धरत याची माहिती राळेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले.

शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा खून झाल्याची वार्ता सोमवारी दुपारपर्यंत पंचक्रोशित पोहोचली. सर्वांनाच पिकाच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी शेतात जागल करावी लागते. आता या घटनेने रात्री शेतात जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून कुठल्या कारणाने झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

१६ दिवसात दहा जणांचा मर्डर-

जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. १६ दिवसांत दहा खून झाले असून, यामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले. पती-पत्नीतील वाद, मालमत्तेचा वाद तर कुठे अवैध व्यवसायातील वर्चस्वाची लढाई अशा प्रकारच्या कारणांनी या घटना घडल्या.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ