शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच केला अ‍ॅसिड अटॅक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:33 IST

Crime News : बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला परवानगी द्यावी म्हणून एका कपलने भयंकर पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे. ज्यानंतर घरच्यांनी तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह पाच आरोपींनी अटक केली आहे. 48 तासांच्या आतमध्ये त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली.

डीएसपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं साजन कुमार नावाच्या तरुणासोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला. तसेच अ‍ॅसिड अटॅक करून शरीराच्या काही भागाला इजा पोहचवण्याचं ठरवलं. असं केल्यानंतर तरुणीच्या घरचे लग्नाला तयार होतील असं त्यांना वाटलं. म्हणूनच 18 ऑगस्टला साजनने आपल्या तीन भावांसह हे कृत्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा साजन आणि तरुणी एकत्रच फिरत होते. 

तरुणीवर दोन तरुणांनी अ‍ॅसिड फेकल्याची घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच हत्या झाली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा संशय होता. यामुळे त्याने तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या झाली. 

भयंकर! पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; असा झाला उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रने नीरजकडून 75 हजार रुपये घेतले आणि तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल असं म्हटलं. मात्र, काही दिवसांनी नीरजने शैलेंद्रला म्हटलं की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. यानंतर शैलेंद्रने नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारत