शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्पदंशाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 22:01 IST

भाईंदरच्या जोशी या सरकारी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने विलंब होऊन केंद्रेंचा मृत्यु झाल्याचे नातलगांनी सांगितले.

ठळक मुद्देगोविंद मारु ती केंद्रे (३१) या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता असे त्यांच्या नातेवाईकांनी बोलुन दाखवले.

मीरारोड - काशिमीरा येथील डाचकुल पाड्यात राहणाऱ्या गोविंद मारु ती केंद्रे (३१) या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. परंतु पोलीसांनी हद्दीचे निमित्त केल्याने आवश्यक पंचनामा आदींची पुर्तता होऊन मृताचा ताबा मिळण्यास उशीर झाल्याने नातलगांनी संताप व्यक्त केला. तर भाईंदरच्या जोशी या सरकारी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने विलंब होऊन केंद्रेंचा मृत्यु झाल्याचे नातलगांनी सांगितले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या डाचकुल पाडा परीसरात मोठ्या प्रमााणात ना विकास क्षेत्र असूनही बेकायदा झोपडपट्टीचे साम्राज्य उभे राहिले आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने ठोस कारवाईच होत नाही. पुर्वीपासूनच हा जंगलपट्टा असल्याने येथे वन्यजीवांचा वावर असतो . याच भागात राहणारा गोविंद केंद्रे हा झोपेत असताना पहाटे दोनच्या सुमारास सापाने दमश केला. हात सुन्न पडला म्हणुन पाहिले असता मनगटामधून एका लहानशा छिद्रातून रक्त येत होते. नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांनी शासनाच्या भाईंदर येथील जोशी रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथे आवश्यक उपचाराची सोय नसल्याने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालय पाठवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी आठ वाजता केंद्रे याचा मृत्यू झाला .काशिमीरा येथील खाजगी रुग्णालयाने केंद्रेला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यास सांगीतले. परंतु सरकार आणि पालिकेच्या कात्रीत अडकलेल्या या रुग्णालयात देखील केंद्रेंवर उपचार करण्यास नकार देत कांदिवलीला शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. वेळीच उपचार होण्यास झालेल्या उशीरा मुळे केंद्रेचा मृत्यु झाला. वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता असे त्यांच्या नातेवाईकांनी बोलुन दाखवले. उपचार वेळीच मिळाला नसताना दुसरीकडे मृत्युनंतर देखील केंद्रेची परवड काही थांबली नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घ्यायचा म्हणुन मयताचे नातेवाईक शताब्दी रु ग्णालय येथील तैनात पोलिसां कडे कागदपत्रे घेण्यासाठी गेले तर त्यांना काशीमिरा पोलीस ठाण्याकडून पंचनामा होईल व नंतर कागदपत्रे मिळतील असे सांगण्यात आले. तुम्ही काशिमीरा पोलीस ठाण्यात जा आणि ते येथे आल्यावर पंचनामा आदी करतील असे तेथील पोलीसांनी सांगीतल्यावर मृताचे नातलग काशिमीरा पोलीस ठाण्यात आले.पोलीस ठाण्यात नातलग ताटकळत उभे असल्याचे पाहून शिवमावळा प्रतिष्ठानचे नामदेव काशिद आदी मदतीला धाऊन गेले. दुपारी तीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी शताब्दी रुग्णालय गाठले. मयताच्या पत्नीचा जबाब, पंचनामा आदी आवश्यक बाबींची पुर्तता केली. त्या नंतर मृतदेह ताब्यात मिळाला. जोशी रुग्णालयात उपचारास दिलेला नकार आणि पोलीसांकडून झालेल्या हद्दीच्या कारणांनी विलंब या बद्दल नातलगांनी संताप व्यक्त केला आहे.  

टॅग्स :snakeसापmira roadमीरा रोडPoliceपोलिसDeathमृत्यू