शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'त्या' दोन शाळकरी मुलींचे अपहरण झाले नव्हते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:39 IST

या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.

मीरारोड - अंधेरी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थींनींचेअपहरण झाले नव्हते असे नवघर पोलीसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. परंतु या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन लहान शाळकरी गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसून आल्याने त्यांनी त्वरीत दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतुन सुटल्यावर बाहेर एका अनोळखी इसमाने तुम्हाला तुमच्या आई कडे घेऊन जातो सांगुन रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वे स्थानकात थांबली आहे सांगुन लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले असे सांगीतले होते. रेल्वे पोलीसांनी नवघर पोलीसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलीसांना अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरु केला. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुली देखील शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेउन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते ते पण दिसून आले. तेथून त्यांनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भाईंदर रेल्वे स्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी इसम वगैरे आढळून आला नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु पोलीसांचा तपास सुरु असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला ? याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.  

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी