शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

'त्या' दोन शाळकरी मुलींचे अपहरण झाले नव्हते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:39 IST

या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.

मीरारोड - अंधेरी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थींनींचेअपहरण झाले नव्हते असे नवघर पोलीसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. परंतु या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन लहान शाळकरी गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसून आल्याने त्यांनी त्वरीत दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतुन सुटल्यावर बाहेर एका अनोळखी इसमाने तुम्हाला तुमच्या आई कडे घेऊन जातो सांगुन रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वे स्थानकात थांबली आहे सांगुन लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले असे सांगीतले होते. रेल्वे पोलीसांनी नवघर पोलीसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलीसांना अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरु केला. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुली देखील शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेउन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते ते पण दिसून आले. तेथून त्यांनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भाईंदर रेल्वे स्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी इसम वगैरे आढळून आला नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु पोलीसांचा तपास सुरु असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला ? याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.  

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी