शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

'त्या' दोन शाळकरी मुलींचे अपहरण झाले नव्हते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:39 IST

या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.

मीरारोड - अंधेरी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थींनींचेअपहरण झाले नव्हते असे नवघर पोलीसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. परंतु या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन लहान शाळकरी गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसून आल्याने त्यांनी त्वरीत दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतुन सुटल्यावर बाहेर एका अनोळखी इसमाने तुम्हाला तुमच्या आई कडे घेऊन जातो सांगुन रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वे स्थानकात थांबली आहे सांगुन लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले असे सांगीतले होते. रेल्वे पोलीसांनी नवघर पोलीसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलीसांना अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरु केला. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुली देखील शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेउन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते ते पण दिसून आले. तेथून त्यांनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भाईंदर रेल्वे स्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी इसम वगैरे आढळून आला नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु पोलीसांचा तपास सुरु असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला ? याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.  

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी