शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अनैतिक संबंधातून बायकोनं दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; कोरोनानं मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:26 IST

आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ, मृतकाची बायको आणि या गुन्ह्यात सहभागी असणारे अन्य ५ साथीदारांना अटक केली आहे

ठळक मुद्देया प्रकरणात मयत व्यक्तीचा मोठा भाऊ तपनदास आणि मयताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. हत्येनंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेमृतकाचा भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी रुपाने उत्तमदासला उदयपूरला पाठवलं होतं. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती

राजस्थानच्या उदयपूर पोलिसांनी एक धक्कादायक गुन्ह्याचा खुलासा केला आहे. ज्यात एका महिलेने दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून नवऱ्याची हत्या केली आहे. विशेष पोलीस पथकाने ५ महिन्याच्या अथक तपासानंतर हा आश्चर्यजनक खुलासा केला आहे. ही घटना उदयपूर शहराच्या प्रतापनगर परिसरात घडली आहे. ५ महिन्यापूर्वी अज्ञात मृतदेह पोलिसांना सापडला होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ, मृतकाची बायको आणि या गुन्ह्यात सहभागी असणारे अन्य ५ साथीदारांना अटक केली आहे. एसपी डॉ. राजीव पचार यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसाच्या विशेष पथकातील कॉन्स्टेबल प्रल्हाद पाटीदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक एका व्यक्तीच्या बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवत असल्याचं कळालं. यातील २ लोकांवर पोलिसांनी पाळत ठेवली. हे लोक मृत व्यक्तीचं प्रमाणपत्र बनवणार होते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केल्यानंतर या दोघांनी इतर ३ साथीदारांसह हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

आरोपींना या हत्येसाठी त्रिपुरा येथील प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती. स्पेशल टीम आणि प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणात मयत व्यक्तीचा मोठा भाऊ तपनदास आणि मयताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. या हत्याकांडाचे मास्टर माईंड मयताचा भाऊ आणि पत्नीला अटक केली. सुपारी देऊन भावाची हत्या केल्याचं पोलिस तपासात कबूल केले.

हत्येनंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मयताचा भाऊ, मयताची पत्नी यांच्यासह ५ स्थानिक गुन्हेगारांना अटक केली आहे. ज्यांनी चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही हत्या घडवून आणली. माहितीनुसार मयक उत्तमदास यांची एक कंपनी होती. ज्याची वर्षाला आर्थिक उलाढाल ५ कोटींची होती. उत्तमदासने कंपनीमार्फत राजस्थान तहसील कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी कंत्राट घेतलं होतं. ज्याचं काम राकेश नावाच्या आरोपींपैकी एक असलेला पाहत होता.

मृतकाचा भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी रुपाने उत्तमदासला उदयपूरला पाठवलं होतं. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती. उत्तमदास उदयपूरला आल्यानंतर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पाजून उत्तमची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह उदयसागर धबधब्याकिनारी फेकला. पोलिसांनी अगोदर आरोपींना पकडलं त्यानंतर मृतकाची ओळख पटली. उत्तमदासच्या घराचा तपास केला असताना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये हत्या केल्यानंतर त्याच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. अनेक दिवसांपासून उत्तमचं मृत्यू प्रमाणपत्र न मिळाल्याने रुपा त्याची संपत्ती आणि अनेक योजनांपासून वंचित होती. याच कारणामुळे तिने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हाती आरोपी सापडले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

टॅग्स :Policeपोलिस