शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:41 IST

उत्तर प्रदेशातील प्रकार; आरोपी मुंबईत पसार

ठळक मुद्देकुर्ला येथील रहिवासी असलेली साबरीन खातून (२०) हिचा मोहम्मद वकील खानसोबत २०१६ मध्ये विवाह झाला. माहेराहून पैशांसह महागड्या वस्तू आणण्यासाठी आग्रह सुरू केला मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी घाबरून मुलीसह मुंबई गाठली.

मुंबई - मुलगी झाली म्हणून पत्नीला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. तेथे गुन्हा दाखल होताच पती मुंबईत पळून आला. त्याला अटक करून बिहार पोलिसांच्या ताब्यात द्या, म्हणून तरुणीने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, आमच्या हद्दीत गुन्हा घडला नसल्याने अटक करू शकत नसल्याचे उत्तर पोलिसांनी दिले आहे.कुर्ला येथील रहिवासी असलेली साबरीन खातून (२०) हिचा मोहम्मद वकील खानसोबत २०१६ मध्ये विवाह झाला. नुकताच गेल्या वर्षी तिने मुलीला जन्म दिला. तेव्हापासून सासरच्यांकडून तिचा छळ सुरू झाला. तिला माहेराहून पैशांसह महागड्या वस्तू आणण्यासाठी आग्रह सुरू केला. तिने नकार देताच मारहाण सुरू केली. याबाबत तिच्या वडिलांना समजताच त्यांनी मुलीकडे धाव घेतली. मुलीला होत असलेल्या मारहाणीबाबत विचारणा करताच त्यांनी कारसह पैशांची मागणी केली. मात्र आता वृद्धावस्थेत कुठून एवढे पैसे आणणार म्हणून त्यांनी जमणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांना मारहाण करत पाठवून दिल्याचे खातूनने सांगितले. त्यानंतर त्याने, तिला तिहेरी तलाक दिला. अखेर, तिने तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी घाबरून मुलीसह मुंबई गाठली. गुन्हा दाखल केल्यानंतर, खानही मुंबईत आला आणि कुर्ला परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच साबरीनने बुधवारी रात्री, याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Divorceघटस्फोटPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक