शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अरुण गवळी, अश्विन नाईकच्या नावाने आंगाडियाकडे खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:45 IST

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

ठळक मुद्देआशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कुख्यात गुंड अरुण गवळी आणि आश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मुंबई - शहरातील संघटित टोळ्या नेस्तनाबूत झाल्या असल्या तरी या टोळ्यांच्या म्होरक्यांच्या नावाने अद्यापही खंडणी उकळली जात असल्याचे एल. टी. मार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी आणि अश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

फोफळवाडी, भुलेश्वर येथे खंजन ठक्कर यांच्या मालकीचे नवनीत अंगाडिया  आणि कुरिअर सर्व्हिस नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक खंजन ठक्कर हे कामानिमित्त गेल्या ६ महिन्यांपासून दुबईला गेले असून त्यांच्या कार्यालयाचे कामकाज अंधेरी येथे राहणारे हर्षद दर्जी (३९)  हे पाहतात. ५  डिसेंबर रोजी ठक्कर यांचे मित्र आशिष मांजरेकर याने त्यांना फोन करून खंज न भाईसे बात करना है, असे सांगून खंजन भाईकडे जे मागितले आहे, ते न दिल्यास ऑफिस उघडून देणार नाही, असे धमकावले. त्यानंतर ४ दिवसांनी मांजरेकर, दांडगे आणि त्यांचे इतर साथीदार  पुन्हा ऑफिसमध्ये आले. त्यानंतर ऑफिस बंद करण्याबाबत शिवीगाळ करून धमक्या देऊ लागले. मात्र, दर्जी यांनी ऑफिस बंद करण्यास विरोध केला असता मांजरेकर व  त्याच्या साथीदारांनी गुलालवाडी येथील ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना धमक्या देऊन तेथील ऑफिस बंद करायला भाग पाडले. तेथून मांजरेकर व त्याचे साथीदार दर्जी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि  कुख्यात गुंड अरुण गवळी, अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करू लागले.

घाबरलेल्या दर्जीने या प्रकरणी केवळ शिवीगाळ केल्याची तक्रार एल. टी. मार्ग पोलिसांत दाखल केली होती. मात्र, खंडन ठक्कर यांच्या सांगण्यावरून त्याने गवळी आणि अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. यानुसार एल. टी. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून मांजरेकर निलेश दांडगे आणि कमलेश मांजरेकर या तिघांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. भुलेश्वर आणि परिसरात आंगाडियांची अनेक कार्यालये असून त्यांच्या कार्यालयात घुसून लूटमार करणे, खंडणीसाठी धमकावणे याचबरोबर चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने येथील आंगाडियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :ExtortionखंडणीArun Gawliअरुण गवळीArrestअटकPoliceपोलिस