शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अरुण गवळी, अश्विन नाईकच्या नावाने आंगाडियाकडे खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:45 IST

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

ठळक मुद्देआशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कुख्यात गुंड अरुण गवळी आणि आश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मुंबई - शहरातील संघटित टोळ्या नेस्तनाबूत झाल्या असल्या तरी या टोळ्यांच्या म्होरक्यांच्या नावाने अद्यापही खंडणी उकळली जात असल्याचे एल. टी. मार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी आणि अश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

फोफळवाडी, भुलेश्वर येथे खंजन ठक्कर यांच्या मालकीचे नवनीत अंगाडिया  आणि कुरिअर सर्व्हिस नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक खंजन ठक्कर हे कामानिमित्त गेल्या ६ महिन्यांपासून दुबईला गेले असून त्यांच्या कार्यालयाचे कामकाज अंधेरी येथे राहणारे हर्षद दर्जी (३९)  हे पाहतात. ५  डिसेंबर रोजी ठक्कर यांचे मित्र आशिष मांजरेकर याने त्यांना फोन करून खंज न भाईसे बात करना है, असे सांगून खंजन भाईकडे जे मागितले आहे, ते न दिल्यास ऑफिस उघडून देणार नाही, असे धमकावले. त्यानंतर ४ दिवसांनी मांजरेकर, दांडगे आणि त्यांचे इतर साथीदार  पुन्हा ऑफिसमध्ये आले. त्यानंतर ऑफिस बंद करण्याबाबत शिवीगाळ करून धमक्या देऊ लागले. मात्र, दर्जी यांनी ऑफिस बंद करण्यास विरोध केला असता मांजरेकर व  त्याच्या साथीदारांनी गुलालवाडी येथील ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना धमक्या देऊन तेथील ऑफिस बंद करायला भाग पाडले. तेथून मांजरेकर व त्याचे साथीदार दर्जी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि  कुख्यात गुंड अरुण गवळी, अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करू लागले.

घाबरलेल्या दर्जीने या प्रकरणी केवळ शिवीगाळ केल्याची तक्रार एल. टी. मार्ग पोलिसांत दाखल केली होती. मात्र, खंडन ठक्कर यांच्या सांगण्यावरून त्याने गवळी आणि अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. यानुसार एल. टी. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून मांजरेकर निलेश दांडगे आणि कमलेश मांजरेकर या तिघांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. भुलेश्वर आणि परिसरात आंगाडियांची अनेक कार्यालये असून त्यांच्या कार्यालयात घुसून लूटमार करणे, खंडणीसाठी धमकावणे याचबरोबर चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने येथील आंगाडियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :ExtortionखंडणीArun Gawliअरुण गवळीArrestअटकPoliceपोलिस