शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेनं घेतला थरकाप उडवणारा बदला! स्वतःसह कुटुंबातील 4 जणांना जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:16 IST

संबंधित महिलेने शनिवारी सकाळी स्वतःसह कुटुंबातील चार जणांवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

बिहारमध्ये पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे संतप्त महिलेने, असे टोकाचे पाऊल उचलले, की संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले. या घटनेत दोन जणांचा जळून मृत्यू झाला आहे. येथे त्यांच्यासाठी रडायलाही कुणी नाही. तर कुटुंबातील दोन जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सुपौल बाजारमधील शेखपूरा भागात घडली.

संबंधित महिलेने शनिवारी सकाळी स्वतःसह कुटुंबातील चार जणांवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेत भाजल्याने ही महिला आणि तिच्या सासूचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती आणि सवत गंभीर रित्या भाजले आहेत. या दोघांनाही सर्वप्रथम स्थानिक सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथून त्यांना डीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. 

मृतांमध्ये बीबी परवीन (35) आणि तिची सासू रुफैदा खातून यांचा समावेश आहे. शेखपुरा मोहल्ला येथील रहिवासी प्लंबर मिस्त्री खुर्शीद आलम याचा गेल्या 10 वर्षांपूर्वी गावातीलच बीबी परवीन हिच्याशी विवाह झाला होता. पण मुले होत नसल्यामुळे खुर्शीदने दोन वर्षांपूर्वी, शेजारच्या गावातील रोशनी खातूनसोबत दुसरे लग्न केले. बीबी परवीनचा या लग्नाला पहिल्यापासूनच विरोध होता. एवढेच नाही, तर याचे भयंकर परिणाम होतील, असा इशाराही ती खुर्शीदला देत होती. महत्वाचे म्हणजे, या विषयावर या दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झाले होते, असेही समजते.

अखेर, बीबी परवीनने शनिवारी सकाळच्या सुमारास, हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरातील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. सर्वत्र, याच घटनेची चर्चा होताना दिसत आहे. कुटुंबातील दोन सदस्यांच्या मृत्यूवर रडण्यासाठीही येथे कुणी नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार