शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पत्नीसोबत भांडला, रेल्वे रुळांवर जाऊन झोपला; तितक्यात ट्रेन आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:17 IST

पत्नीसोबत होत असलेल्या भांडणामुळे तो वैतागला आहे. तो रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता.

जाको राखे साइयां, मार सके न कोय... ही म्हण यूपीच्या मथुरेतील एका तरूणावर तंतोतंत बसते. पत्नीसोबत होत असलेल्या रोजच्या भांडणाला कंटाळून तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला. रेल्वे आली आणि त्याच्यावरून गेली. मात्र, सुदैवाने तरूणाला काहीच इजा झाली नाही. त्याचा जीव वाचला.

Navbharat Times ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मथुरेच्या राया पोलीस स्टेशन भागातील मांट रेल्वे क्रॉसिंग येथील आहे. इथे बहादीन येथे राहणारा ४५ वर्षीय पुरूष गजेंद्र पत्नीसोबतच्या रोजरोजच्या भांडणाला कंटाळला होता. त्यामुळे आत्महत्या करून आपलं जीवन संपण्याचा त्याने निश्चय केला होता.

रायामध्ये रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी आलेला गजेंद्र रेल्वे टॅकवर झोपला. तरूणाला रेल्वे ट्रॅकवर झोपलेलं पाहून त्याचा वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक आरडाओरड करू लागले होते. पण तोपर्यंत रेल्वेल त्याच्या अंगावर निघून गेली होती. रेल्वे गेटमनने धावत जाऊन पाहिले तर तरूणी निवांत तिथेच पडलेला होता. नंतर त्याला काही लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राया प्रभारी निरीक्षक उत्तमचंद पटेल हेही घटनास्थळी पोहोचले. बरंच समजावल्यानंतर पोलीस तरूणाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. घटना रेल्वेशी संबंधित असल्याने आरपीएफचे उप-निरीक्षक नारायण सिंह हे सुद्धा तिथे पोहोचले.

उप-निरीक्षक नारायण सिंह यांनी सांगितले की, तरूण म्हणाला की, पत्नीसोबत रोज छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याचं भांडण होत राहतं. पत्नीसोबत होत असलेल्या भांडणामुळे तो वैतागला आहे. तो रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता. मात्र, त्याची वेळ आली नव्हती. तरूणाला समजावून घरी परत पाठवण्यात आलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी