शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:23 IST

एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले.

भाजीपाला सातत्याने महाग होत आहे. अशा स्थितीत भाजी चोरीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील बाजारात एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या घटनेची चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली शहर परिसरात लखनौ रोडवर बांधलेल्या नवीन बाजारपेठेत घाऊक भाजीचा व्यापार केला जातो. शहर परिसरातील भाजी मंडई व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर बाजारपेठेतील व्यापारीही येथून भाजी खरेदी करतात. दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरून नेला होता. काल रात्री चोरट्यांनी एका एजंटचे सुमारे 25 किलो टोमॅटो भरलेलं कॅरेट, बटाट्याची पोती व इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य चोरून नेले. 

सकाळी मालक राजाराम यांनी पाहिलं असता त्यांना या चोरीच्या घटनेची माहिती मिळाली. सुमारे बारा हजार किमतीचा भाजीपाला व इतर माल चोरट्यांनी चोरून नेल्याचे राजाराम यांनी सांगितले. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी 120 ते 130 रुपयांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तरा काही ठिकाणी 150 रुपये प्रति किलोपर्यंत होत आहे. 

सकाळी दहापर्यंत हा बाजार सुरू राहतो आणि नंतर बंद होतो. त्यामुळे ते टोमॅटो तिथेच ठेवतात. व्यापऱ्यांनी आम्ही टॅक्स देत असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतरही बाजार प्रशासन सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करत नाही. त्यामुळे रोजच चोरीच्या घटना घडत आहेत. आता व्यापारी स्वतः मालाची काळजी घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी