शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अपघात; रासायनिक कंपनीमध्ये 3 कामगार भुयारी टाकीत उतरवले, गुदमरून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 1:19 PM

accident in Ambernath MIDC: अंबरनाथ वडोल गाव येथिल एका रासायनिक कंपनीत असलेल्या भयारी रासायनिक टाकीला कलर लावण्यासाठी तीन कामगारांना बोलावण्यात आले होते. मात्र ठेकेदराने या कामगारांना या रासायनिक टाकीत साफ सफाई करण्यासाठी पाठविले.

अंबरनाथ: अंबरनाथएमआयडीसी मधील आयटीआय परिसरात असलेल्या रासायनिक कंपनीत भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा काम अग्निशमन दलामार्फत करण्यात येत आहे. (Three workers suffocated in Chemical factory Ambernath.)

कंपनीत वेस्ट ऑईलवर प्रक्रिया करून रिसायकल करण्याचं काम केलं जाते.  ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असून सध्या कंपनीच्या साफसफाई आणि नूतनीकरणाचं काम सुरू होते. यासाठी गोवंडी इथून चार कामगारांना रंगकामासाठी आणण्यात आले होते. या कामगारांना मागील आठवडाभरापासून कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करण्यास सांगण्यात आलेनहोते. त्यापैकीच एक टाकी साफ करत असताना अचानक या कामगारांना केमिकलच्या उग्र दर्पामुळे गुदमरू लागल्याने एक कामगार बाहेर आला. तर इतर तिघे टाकीतच बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले तिन्ही कामगार मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांना या कामासाठी कुठल्याही सुरक्षात्मक वस्तू, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पालिका अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. या सगळ्यामध्ये निष्काळजीपणा दिसत असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या टाकीत रसायनिक द्रव साठवले जात होते. असे असतानाही कामगारांना त्या टाकीत कोणतीही सुरक्षा साधन न वापरता काम करण्यासाठी उतरविण्यात आले. ही घटना घडल्यावर अग्निशमन दल लागलीच घटनास्थळी गेले असून या टाकीतून कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तर या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार धरून थेट कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली.

टॅग्स :ambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी