शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 20:20 IST

अटक : ९७ गोण्या केल्या होत्या लंपास

ठळक मुद्देअयोध्यानगरातील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय४७) यांची औद्योगीक वसाहत व्ही सेक्टर मध्ये रिद्धी सिद्धी दालमिल आहे.

जळगाव  : औद्योगीक वसाहत परिसरातील रिद्धी-सिद्धी दालमिलमधून कामगारानेच पावणे तीन लाखाच्या हरभरा डाळीच्या ९७ गोण्या लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मिश्रीलाल शिवलाल जावरकर (४२, रा. रायपुर, ता.खालवा जि.खंडवा) याला सोमवारी सकाळी अटक केली.  चोरलेली डाळ बाहेर गावी विक्री केली असून त्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

अयोध्यानगरातील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय४७) यांची औद्योगीक वसाहत व्ही सेक्टर मध्ये रिद्धी सिद्धी दालमिल आहे. दर शनिवारी दालमिलमध्ये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची मोजणी करुन छाटणी होते. १७ ऑक्टोबर रोजी सर्व मालाची मोजणी करण्यात आली होती. प्रकाश जोशी ३१ ऑक्टोबरला बाहेरगावी गेल्याने दालमिलमध्ये ७ कामगार नेहमी प्रमाणे कार्यरत होते. शनिवार ७ नोहेंबर रोजी जोशी परत आल्यावर त्यांनी कंपनीत येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची माहिती घेतली. प्रकाश जोशी व त्याचा मित्र योगेश पाटील माल मोजत असतांना त्यांना शटरला लागून असलेला पत्रा वाकवलेल्या स्थितीत आढळून आला. सर्व कामगारांना बोलावून डाळीचे पोते मोजून घेतल्यावर तब्बल हरभरा डाळीचे ९८ पोती कमी भरली.  चोरट्यांनी दालमिलच्या शटर शेजारील पत्रा वाकवून चोरी केल्याचे आढळून आल्याने प्रकाश जोशी यांनी रविवारी एमआयडीसी पेालिसांत धाव घेतली. चोरट्यांनी २ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे ९८ पोते डाळ चोरीला गेल्याप्रकरणी जोशी यांनी तक्रार दिली. दरम्यान, रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रतिलाल पवार यांच्या पथकाने जावरकर याला अटक केली.  न्या.सुवर्णा कुळकर्णी यांनी त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक