शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भयावह! अंगावर २० गोळ्या झाडल्या; हत्या करुन पंजाबवरुन थेट महाराष्ट्रात आले, लपले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:59 IST

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाच्या होते संपर्कात

मुंबई/कल्याण : पंजाबमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आणि महाराष्ट्रात लपून बसलेल्या गँगस्टर सोनू खत्री गँगच्या तिघा गुंडांना कल्याणजवळ अटक केली. हे तिघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याच्या संपर्कात होते. त्याच्याच इशाऱ्यावरून ते महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मोहीम राबवीत तिघांनाही गजाआड केले.

शिवम अवतारसिंह माहोल, गुरमुख नरेश कुमार सिंह ऊर्फ गोरा आणि अमरदीप कुमार गुरमेलचंद अशी या गुन्हेगारांची नावे असून तिघेही कल्याणजवळ आंबिवली येथे लपले होते. तिघेही हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री, तस्करी, स्फोटके तयार करणे यासारख्या गुन्ह्यांत सराईत आहेत. या पार्श्वभूमीवर बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायांप्रकरणीही तपास यंत्रणा या तिघांची चौकशी करत आहेत.

रिंडा हा गुन्हेगार आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांचा मुख्य दुवा होता.  महाराष्ट्र, चंडीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह इतर ठिकाणांच्या गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणांकडून त्याचा शोध सुरू होता. रिंडा २००८ मध्ये गुन्हेगारी जगतात आला. चंडीगडमधील होशियारपूरचे सरपंच सतनाम सिंह यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. सुमारे ३० गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

वीस गोळ्या घालून हत्या

२८ मार्च २०२२ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पंजाबच्या नवाशहर तालुक्यातील कंगा गावात पंचायत सदस्य मख्खन सिंह नजीकच्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी कारमधून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी मख्खन सिंह यांच्यावर वीस गोळ्या झाडल्या. यात सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. एवढे करूनही हल्लेखोर थांबले नाहीत. त्यांनी सिंह यांच्या तोंडातही गोळ्यांची अक्षरश: बरसात केली. त्यानंतर तिघेही फरार झाले होते.

हरविंदर सिंह रिंडाची हत्या झाल्याचा दावा?

हरविंदर सिंह रिंडा हा खलिस्तानी दहशतवादी असून त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याची पाकिस्तानात हत्या झाल्याची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली होती. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला होता. मे महिन्यात पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला आणि लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटात रिंडा मुख्य सूत्रधार होता, तसेच प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणातही रिंडा याचे नाव समोर आले होते.

५ महिन्यांपासून होते कल्याणमध्ये

मख्खन सिंह यांच्या हत्येनंतर तिघांनीही थेट मुंबई गाठली. पाच महिन्यांपासून ते आंबिवलीत भाड्याच्या घरात राहत होते. मजूर म्हणून राहण्याचे निर्देश त्यांना दिले होते, अशी माहिती पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे डीएसपी राजन परमिंदर यांनी दिली. दरम्यान, गँगस्टर सोनू खत्री हा रिंडा याचा साथीदार होता, तसेच पंजाबातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना मदत करण्याची  तयारीही त्याने केली होती, अशी माहिती समोर आल्याचेही परमिंदर यांनी म्हटले आहे.

हत्येमागे पूर्ववैमनस्य 

मख्खन सिंह यांच्या हत्येनंतर पोलिस चौकशीत सोनू खत्री गँगचे नाव समोर आले. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघड झाले. हत्येनंतर तिघांंनी पंजाबातून पळ काढला. बराच काळ तिघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर हे प्रकरण पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सकडे सोपविण्यात आले. त्यानुसार तिघांचा कसून शोध घेतला जात होता. तपासादरम्यान तिघेही बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा याच्या संपर्कात असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असल्याची माहिती मिळाली. 

सर्व बाबी पडताळून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे एक पथक मुंबईला पोहोचले आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाईत तिघांना आंबिवलीच्या एनआरसी कॉलनीतील एका घरातून अटक करण्यात आली. सध्या तिघांनाही पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूArrestअटकPunjabपंजाबPoliceपोलिस