शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पळून गेलेले प्रेमीयुगुल हजर झाल्याने न्यायालय आवारात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 18:07 IST

पोलिसांच्या समयसुचकतेमुळे टळला अनर्थ 

ठळक मुद्देसोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.जळगावातील करिश्मा (२५) व सागर (२४) यांच्यात गेल्या पाच वर्षापासून प्रेमप्रकरण होते. न्यायालायात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जळगाव - जळगावातून पळून गेलेले प्रेमीयुगुल लग्न करुन न्यायालयात हजर झाल्याने न्यायालय आवारात तणाव निर्माण झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता न्यायालय आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रेमीयुगुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. 

जळगावातील करिश्मा (२५) व सागर (२४) यांच्यात गेल्या पाच वर्षापासून प्रेमप्रकरण होते. कुटुंबाचा लग्नाला होणारा विरोध पाहता दोघांनी २८ मार्च रोजी घरातून पलायन केले. या दोघांनी भिवंडी येथे लग्न केले.   सागर व त्याच्या कुटुंबाने मुलीला पळवून  डांबून ठेवल्याचा अर्ज  करिश्माच्या आईने न्यायालयात दिला. त्यावरुनकरिश्मा व सागर या दोघांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले होते. सोमवारी हे प्रेमीयुगुल न्या.जी.जी.कांबळे यांच्यासमोर हजर झाले.  या दोघांना नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  घटनेच्या पार्श्वभूमीवर न्या. कांबळे यांनी दोघांच्या पालकांना बोलावून  कायदा हातात घेऊ नका, अशी समज दिली. 

प्रेमीयुगुल न्यायालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर करिश्माच्या पालकांकडील काही लोकांचा जमाव करिश्माच्या दिशेने चालत आला. तिला ओढून ताब्यात घेणार  तितक्यात पोलीस हेकॉ.रामकृष्ण पाटील यांनी समयसूचकता बाळगून तातडीने करिश्माला  सुरक्षितरित्या न्यायालयात आणले. यानंतर न्यायालायात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस