शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:54 IST

Suspicious Death of soldier : तो त्याच्या बडगाममधील गावातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी बडगाममधील खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून गुरुवारी सैनिक असलेलया समीर अहमद मल्लाचा मृतदेह सापडला.

जम्मू काश्मीर - तीन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या भारतीय सुरक्षा दलातील एका जवानाचा मृतदेह आज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहावर कुठलीही जखम नाही आहे. तो त्याच्या बडगाममधील गावातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी बडगाममधील खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून गुरुवारी सैनिक असलेलया समीर अहमद मल्लाचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी सांगितले की, त्याच्या शरीरावर बंदुकीची कोणतीही जखम आढळली नसली तरी तो अतिरेक्यांनी मारला आहे का याचा तपास करत आहेत. खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून मल्लाचा मृतदेह सापडला आहे. “समीर अहमद मल्ला या सैनिकाचा मृतदेह मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सापडला होता, तो खग बडगामच्या लोकीपोरा गावातून बेपत्ता झाला होता,” पोलिसांनी सांगितले.

"प्राथमिक तपासादरम्यान, सैनिकाच्या शरीरावर बंदुकीची कोणतीही जखम आढळली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास जोमाने सुरू आहे आणि त्याच्या मृत्यूची परिस्थिती सर्व बाजूंनी तपासली जात आहे,” पुढे पोलीस म्हणाले.जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री (JAKLI) चे सैनिक असलेले मल्ला रजेवर होते कारण त्यांच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मात्र, सोमवारी दुपारी ते बेपत्ता झाले. त्याचे काका हबीबुल्लाह मलिक म्हणाले की, मल्ला शेजाऱ्याला भेटायला गेला होता, पण घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद होता.

मलिक म्हणाले की, मल्ला माझमा गावात त्याच्या सासरच्या ठिकाणी रात्र घालवत असे आणि दिवसा लोकीपोरा येथे परतायचे. “त्या दिवशी, तो आपल्या मोठ्या मुलासह घरी परतला. सासरी जाण्यापूर्वी, त्याने आपल्या आईला सांगितले होते की तो आपल्या मुलासह संध्याकाळी माझमाला परत जाईल,” असे सांगितले.

मल्लाचे काय झाले याबद्दल कुटुंबीयांना काहीही माहिती नसताना, अतिरेक्यांनी त्याचे अपहरण केले असावे आणि त्याच्या सुटकेसाठी आवाहन केले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. मल्ला २०१८ मध्ये चर्चेत आला होता जेव्हा लष्करी अधिकारी मेजर लीतुल गोगोई यांना श्रीनगरच्या हॉटेलमधून एका मुलीसह ताब्यात घेण्यात आले होते. मेजर गोगोई आणि मुलीला मल्लाने त्याच्या वैयक्तिक कारमधून हॉटेलमध्ये सोडले आणि हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी वाद झाला जेव्हा हॉटेल व्यवस्थापकाने ती मुलगी स्थानिक रहिवासी असल्याचे आढळल्याने त्यांना बुकिंग नाकारले. मेजर  गोगोई, ज्यांनी पूर्वी एका गावकऱ्याला त्याच्या जीपच्या बोनेटला बांधले होते आणि निवडणुकीच्या दिवशी त्याची गावोगावी धिंड काढली होती, त्यांच्यावर लष्कराने “स्थानिक महिलेशी सलगी” केल्याचा आरोप लावला होता.

टॅग्स :Deathमृत्यूMissingबेपत्ता होणंJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकPoliceपोलिसterroristदहशतवादी