शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sushant Singh Rajput: जाणून घ्या, कोण आहे ‘AU’? रिया चक्रवर्तीने याच नंबरवर केले होते ६३ कॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:57 IST

Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समधून ती बॉलिवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्देरियाने AU नावाने तिच्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह केला आहे. हा नंबर संशयास्पद आहेअनन्या रियाची फॅमिली फ्रेंड आहे. या कारणास्तव, दोघांमध्ये वारंवार संभाषण सुरू होते.या क्रमांकावरुनही बरीच चर्चा होत आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण रियाच्या टीमकडून आलं आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर मुंबई पोलीस तपासात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतंय अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू चौकशीत दररोज नवीन खुलासे उघड होत आहेत. सुशांतचे कॉल डिटेल रेकॉर्ड्सही समोर आले आहेत. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समधून ती बॉलिवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. रिया आमिर खान, रकुल प्रीत सिंग, आदित्य रॉय कपूर, राणा दग्गुबाती, सनी सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्याशी बोलली आहे. तथापि, या यादीमध्ये एक नंबर देखील आहे जो संशयास्पद असल्याचं बोललं जाते.

मीडिया रिपोर्टनुसार रियाने AU नावाने तिच्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह केला आहे. हा नंबर संशयास्पद असल्याचं सांगितले जाते. रियाने या क्रमांकावर ६३ वेळा संवाद साधला आहे. या क्रमांकावरुनही बरीच चर्चा होत आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देखील रियाच्या टीमकडून आलं आहे. AU नावाने सेव्ह केलेल्या या क्रमांकाबद्दल रिया चक्रवर्ती यांच्या टीमच्या वतीने म्हटलं आहे की, हा नंबर अनन्या उधासचा आहे. अनन्या रियाची फॅमिली फ्रेंड आहे. या कारणास्तव, दोघांमध्ये वारंवार संभाषण सुरू होते. मात्र, रिया आणि अनन्या यांच्यात इतके संभाषण का झाले हे उघड झाले नाही.

इतकचं नाही तर रियाने आमिर खानला एकदा फोन केला तर आमीरने तिला तीन मेसेज पाठवले होते. रियाने आदित्य रॉय कपूरला १६ वेळा कॉल केला तर आदित्यने तिला सात वेळा कॉल केला. ३० वेळा प्रीत सिंहला फोन केला तर त्यांच्याकडून १४ वेळा कॉल आला होता. रियाने श्रद्धा कपूरला तीन वेळा कॉल केला तर श्रद्धाने दोनदा फोन केला होता.

रियाला 'सोनू के टीटू की स्वीटी' फेम अभिनेता सनी सिंगने सात वेळा कॉल केला, तर तिने चार वेळा फोन केला. रिया राणा दग्गुबातीशीही बोलली. रियाने राणाला सात वेळा फोन केला तर त्याच्याकडून चार कॉल आले. सुशांतची प्रकृती बिघडल्यामुळे रिया महेश भट्ट यांच्याशी सतत संपर्कात होती. रियाने महेश भट्टला नऊ वेळा फोन केला. महेश भट्ट यांचे सात कॉल आले होते.

सुशांत सिंगच्या कॉल रेकॉर्डमध्ये काय?

या प्रकरणी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्यात कोणतंही संभाषण झालं नसल्याचं दिसून येते. ८ ते १४ जून या काळात सुशांतचे त्याच्या बहिणींसोबत अनेकदा फोनवरुन चर्चा झाल्याचं आढळून आलं होतं. सुशांत सिंग राजपूतचे वकील विकास सिंह यांनी मुलाखतीत म्हटलं होतं की, सुशांतच्या घरातून गेल्यानंतर रियाने सुशांतचा कॉल ब्लॉक केला होता. रिया आणि सुशांतमध्ये ८ ते १४ जूनदरम्यान काहीही संवाद झाला नाही. रियानेही सुशांतला फोन केला नाही तर सुशांतने तिला फोन केला नाही. रियाने जानेवारी महिन्यात १ दिवसात सुशांतला १९ वेळा कॉल लावल्याचं सांगितलं जात होतं. पण मृत्यूपूर्वी सुशांतच्या कॉल रेकॉर्डनुसार रियाचं त्याच्यासोबत काहीही बोलणं झालं नाही. सुशांतची बहिण राणी हिने सुशांतला ८ ते १४ जूनमध्ये एकाद कॉल केला होता. त्यानंतर सुशांतने बहिण राणीला एकदा कॉल केला होता. टॅलेंट मेनेजरने सुशांतला ५ वेळा कॉल केला होता. या काळात रियाने सुशांतला कॉल केला नाही. तर सुशांतची दुसरी बहिण मीतू हिने एकदा त्याला कॉल केला होता.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीPoliceपोलिस