शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पोलिसांना कोरोनाच्या संसर्गाची धास्ती, ५० टक्के ड्युटी लावण्याचा आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 13:07 IST

महासंचालकांचे आदेश आयुक्त, अधीक्षकांकडून दुर्लक्षित

ठळक मुद्दे या विषाणूचा संसर्ग त्यांनाही जडण्याचा धोका असल्याने प्रत्येक पोलीस ठाणे व विविध शाखामध्ये कार्यरत असलेल्यापैकी ५० टक्के अधिकारी, अंमलदारांची ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेतदेशात कोरोनाची सर्वाधिक लागण असलेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असून ती दिवसेंदिवस वाढत राहिली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. सहाय्यक आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी घरी किंवा कार्यालयात बसून कनिष्ठ अधिकाऱ्यांना फर्मान सोडत आहेत.

जमीर काझीमुंबई : प्रत्येक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले राज्य पोलीस दलातील सव्वा दोन लाखावर खाकी वर्दीवाले ‘कोरोना’च्या पादुर्भावाला लगाम घालण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूचा संसर्ग त्यांनाही जडण्याचा धोका असल्याने प्रत्येक पोलीस ठाणे व विविध शाखामध्ये कार्यरत असलेल्यापैकी ५० टक्के अधिकारी, अंमलदारांची ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत, मात्र त्यांच्या या आदेशाकडे पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी अद्यापही डोळेझाक केली आहे.

सर्वच पोलिसांना कामावर पाचारण करण्यात येत आहे.नेहमीप्रमाणे त्यांना ड्युटी लावण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांमध्ये संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयासह जिल्ह्याच्या ठिकाणी काहीचा अपवाद वगळता बहुतेक वरिष्ठ अधिकारी घरी बसून किंवा कार्यालयातून सूचना देत आहेत. मात्र निरीक्षक व त्याखालचे अधिकारी आणि अंमलदारांना रोज पोलीस ठाणे व रस्त्यावर बंदोबस्ताची ड्युटीला सामोरे जावे लागत आहे. खात्यातील शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांना वरिष्ठांच्या मनमानीबद्दल उघडपणे बोलता येत नसल्याने तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.राज्यासह पुर्ण जगाला कोरोनाच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक लागण असलेल्या रुग्णांची संख्यामहाराष्ट्रात असून ती दिवसेंदिवस वाढत राहिली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोरोनाग्रस्ताच्या सानिध्यात असलेल्यांनाही त्याची लागण होत असल्याने ही संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व सरकारी, खासगी अस्थापनाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी ठेवून उर्वरिताना सुट्टी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कालावधीत सर्व पोलीसही नागरिकांच्या मदतीला जुंपले असून सार्वजनिक वाहतुक कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना या विषाणूचा पादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने सर्व घटक प्रमुखांनी आपापल्या शाखा, ठाण्यातील पोलिसांची हजेरी ५० टक्के लावावी, एकदिवसाआड त्यांना आलटून पालटून ड्युट्या देण्यात याव्यात, पोलिसांना या आजाराची लागण होवू नये, यासाठी विशेष खबरदारी बाळगण्याचे आदेश १९ मार्चला पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्याकडून बजाविण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी तातडीने करावयाची असताना बहुतेक घटकप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सहाय्यक आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी घरी किंवा कार्यालयात बसून कनिष्ठ अधिकाऱ्यांना फर्मान सोडत आहेत.

Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार

काय आहेत महासंचालकांचे आदेश ?पोलीस महासंचालकांनी गुरूवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व विभाग, शाखा व पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांची हजेरी ५० टक्केवर आणावी, अतिमहत्वाचे व तातडीचे कामासाठी तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवरील गर्दी कमी करण्याचे काम त्यांना देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांना रोज कार्यालयात न बोलाविता आळीपाळीने ड्युटी लावाव्यात, प्रत्येक शाखेत दोन टीम तयार ठेवून त्यापद्धतीने आखणी करण्यात यावी,

अधिकारी, अंमलदारांना कोरोनाचा संसर्ग होवू नये,यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेवून ड्युटीचे नियोजन करावे, पोलिसांना रोज सलगपणे ड्युटी देवू नये, त्यांच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात यावी - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक)

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र