शिलाँग येथे झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता धक्कादायक सत्य समोर आले आहे. ९ जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार, राजाचा खून त्याची पत्नी सोनमनेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला स्वतःला निष्पाप आणि पीडित दाखवण्याचा सोनमचा प्रयत्न फसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिलाँगच्या दऱ्यांमध्ये राजा रघुवंशीला शेवटचा धक्का सोनमनेच दिला होता. याचा अर्थ, तिनेच आपल्या पतीला दरीत ढकलले होते. विशेष म्हणजे, दरीत फेकण्यापूर्वी राजाचा श्वास सुरू होता आणि अखेरच्या श्वासापर्यंत तो मारेकऱ्यांशी लढत राहिला होता.
हत्त्येचा पूर्वनियोजित कटराज कुशवाहा, सोनम आणि तीन मारेकऱ्यांनी मिळून राजाच्या हत्त्येचा कट रचला होता. राजा आणि सोनम शिलाँगमध्ये पोहोचताच आरोपींनी राजावर हल्ला केला. राजाने धैर्याने प्रतिकार केला, परंतु त्याच्या छातीवर आणि डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याला प्रतिकार करणे कठीण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींपैकी एक विशाल चौहान याने राजाच्या डोक्यावर मागून हल्ला केला. यावेळी सोनम तिथे उभी राहून, "त्याला मारून टाका!" असे ओरडत होती. आरोपींनी सांगितले की, राजा रघुवंशीला दरीत ढकलण्यापूर्वी तो जिवंत होता. त्याला दरीत ढकलण्यात अडचण येत असल्याने सोनमने त्याला मदत केली आणि शेवटचा धक्का दिला, ज्यामुळे राजा रघुवंशी खोल दरीत कोसळला.
हत्येपूर्वी आईशी संवाद, मारेकऱ्यांची रेकीआरोपींनी असेही सांगितले की, हत्येच्या केवळ अर्धा तास आधी सोनमने राजाच्या आईशी फोनवर बोलले होते. आरोपींपैकी आकाश नावाचा एक जण खाली बाईकवर पाळत ठेवून होता, जेणेकरून कोणी येत आहे का याची तो माहिती देऊ शकेल. सोनमने नेमलेल्या मारेकऱ्यांनी हत्येच्या एक दिवस आधी, म्हणजेच २२ मे रोजी, राजाशी मैत्री केली. राजाला विश्वासात घेऊन त्यांनी २३ मे रोजी या भयंकर कटाला पूर्णत्वास नेले. हत्येनंतर सर्व आरोपी राज कुशवाहासोबत इंदूरला परत आले, तर सोनम तिथेच फिरत होती.