शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपअधीक्षकांच्या सतर्कतेमुळे केवळ चार तासात सापडला घर सोडून गेलेला मुलगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:07 IST

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य ...

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य वसई सोडण्याआधीच सापडला. 

नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड काल रात्री साडेअकराच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर होते. वसईच्या हद्दीत त्यांना एक मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. तोटेवाड यांनी लगेच आपले वाहन थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा तो मुलगा काहीच सांगायला तयार नव्हता. माझे हात पाय तोडा, मारून टाका पण मी घरचा पत्ता सांगणार नाही, असे त्याने सांगितले. त्या मुलाची नाजूक मानसिक अवस्था पाहून पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याचे ठरवले. पोलीस त्याला आपल्या गाडीतून रात्रभर फिरवून समजूत काढत होते. मात्र, तो काहीच ताकास तूर लागू देत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी कुठे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे का ते तपासले. तर अशी कुठलीही तक्रार नव्हती. त्यामुळे पेच आणखीन वाढला. 

तोटेवाड यांनी समजूत काढल्यानंतर दोन तासांनी त्याने आपले नाव सौम्य सिंह (वय १२) असल्याचे सांगितले. तो नालासोपारा पश्चिमेच्या सेंट्रल पार्क येथे राहणारा होता. आई वडील सतत अभ्यासासाठी दबाब टाकत असल्याने तो वैतागला होता आणि घर सोडून निघाला होता. लोकलल ट्रेन पकडून मुंबईला जाऊन काहीतरी काम करून रहायचे असे त्याने ठरवले होते. मात्र पोलिसांना तो वेळीच सापडल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्या पालकांनी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत बोलताना उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले की, हा चांगल्या घरातील मुलगा होता. पुन्हा कधी घरी जायचे नाही या निश्चयाने तो बाहेर पडला होता त्याच्याकडे मोबाईल नव्हता की पैसे नव्हते. ट्रेनने मुंबईला गेला असता तर समाजकंटकांच्या हाती पडला असता. आणि नको ते घडले असते, वाम मार्गाला गेला असता असे त्यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस