शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पोलीस उपअधीक्षकांच्या सतर्कतेमुळे केवळ चार तासात सापडला घर सोडून गेलेला मुलगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:07 IST

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य ...

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य वसई सोडण्याआधीच सापडला. 

नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड काल रात्री साडेअकराच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर होते. वसईच्या हद्दीत त्यांना एक मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. तोटेवाड यांनी लगेच आपले वाहन थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा तो मुलगा काहीच सांगायला तयार नव्हता. माझे हात पाय तोडा, मारून टाका पण मी घरचा पत्ता सांगणार नाही, असे त्याने सांगितले. त्या मुलाची नाजूक मानसिक अवस्था पाहून पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याचे ठरवले. पोलीस त्याला आपल्या गाडीतून रात्रभर फिरवून समजूत काढत होते. मात्र, तो काहीच ताकास तूर लागू देत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी कुठे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे का ते तपासले. तर अशी कुठलीही तक्रार नव्हती. त्यामुळे पेच आणखीन वाढला. 

तोटेवाड यांनी समजूत काढल्यानंतर दोन तासांनी त्याने आपले नाव सौम्य सिंह (वय १२) असल्याचे सांगितले. तो नालासोपारा पश्चिमेच्या सेंट्रल पार्क येथे राहणारा होता. आई वडील सतत अभ्यासासाठी दबाब टाकत असल्याने तो वैतागला होता आणि घर सोडून निघाला होता. लोकलल ट्रेन पकडून मुंबईला जाऊन काहीतरी काम करून रहायचे असे त्याने ठरवले होते. मात्र पोलिसांना तो वेळीच सापडल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्या पालकांनी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत बोलताना उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले की, हा चांगल्या घरातील मुलगा होता. पुन्हा कधी घरी जायचे नाही या निश्चयाने तो बाहेर पडला होता त्याच्याकडे मोबाईल नव्हता की पैसे नव्हते. ट्रेनने मुंबईला गेला असता तर समाजकंटकांच्या हाती पडला असता. आणि नको ते घडले असते, वाम मार्गाला गेला असता असे त्यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस