शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Manav Sharma : "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात"; मानव शर्माचे शेवटचे शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:29 IST

Manav Sharma : २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने समाज, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता. कौटुंबिक वादामुळे त्रस्त झालेल्या मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बनवलेल्या ६ मिनिटे ४७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, मानव रडत म्हणाला, "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात."

"लोकांना वाचवण्याची गरज आहे, अन्यथा एक वेळ अशी येईल जेव्हा असा कोणीही माणूस उरणार नाही ज्याला तुम्ही दोष देऊ शकाल. हा खूप कठीण काळ आहे. मी तुम्हाला माझे सांगतो. भाऊ, सगळ्यांचं सारखंच आहे. माझंही तसंच आहे. मला माझ्या पत्नीबद्दल कळालं. दुसऱ्या कोणासोबत तरी... काही हरकत नाही. कृपया हे पाहा आणि ऐका. मला जायला हवं."

"बरं, मला आता जायचं आहे, पण मी अजूनही हेच म्हणतोय की बघा... पुरुषांबद्दल विचार करा, कृपया विचार करा. अरे कोणीतरी पुरुषांबद्दल बोला. ते बिचारे खूप एकटे आहेत. ठीक आहे... सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, सॉरी अक्कू... पण मित्रांनो कृपया समजून घ्या. मी गेल्यावर सगळं ठीक होईल. तर मला जाऊ द्या. मी अजूनही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या आयुष्यातील माणसाबद्दल विचार करा, त्यांच्याबद्दल विचार करा. तुम्ही  स्वतःची काळजी घ्या. हो, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की माझ्या पालकांना अजिबात हात लावू नका." हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे आत्महत्येचे प्रकरण पाहून लोक हैराण झाले आहेत.

आग्रा येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या मानव शर्माचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी झाले. लग्नानंतर काही काळ सगळं काही नॉर्मल होतं, पण नंतर हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली. मानवचे वडील नरेंद्र शर्मा हे हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मानवच्या लग्नानंतर काही महिन्यांनी भांडणं सुरू झाली होती. सून भांडायची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी द्यायची. तिला तिच्या एका मित्रासोबत राहायचं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश