शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

साहेब माझं लग्न लावून द्या!  महिला पोलिसाने वरिष्ठांकडे पोहोचताच पोलीस अधिकाऱ्याचे बदलले सूर; म्हणाला लग्नासाठी तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 17:16 IST

Police inspector is pleading with the police officers to get married to the female si - घाटमपूर कोतवाली येथे तैनात निरीक्षक एटा येथील रहिवासी आहेत. कल्याणपूर कोतवाली येथे निरीक्षक तैनात म्हणून होता तेव्हा त्याचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते.

ठळक मुद्देतो एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणत आहे की, तू माझ्याशी लग्न करशील का?

कानपूर - कानपूर पोलिसांकडून एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. पोलिस विभाग ते शहरापर्यंत ही प्रेमकथा चर्चेचा विषय बनला आहे. कानपूरच्या घाटमपूर कोतवाली येथे तैनात एका पोलीस निरीक्षकाचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमधील प्रेमप्रकरण सुरू होते. काही कारणांमुळे, पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिला आणि महिला एसआयला मारहाण केली. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलीस निरीक्षकाचा सूर बदलला. आता निरीक्षक म्हणतोय की सर, माझे लग्न करून द्या. यासह, तो एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणत आहे की, तू माझ्याशी लग्न करशील का?घाटमपूर कोतवाली येथे तैनात निरीक्षक एटा येथील रहिवासी आहेत. कल्याणपूर कोतवाली येथे निरीक्षक तैनात म्हणून होता तेव्हा त्याचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावेळी त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलही बरीच चर्चा होती. निरीक्षकाची घाटमपूर कोतवाली येथे बदली झाली. यानंतरही मोबाईल फोनवरून दोघांमध्ये बातचीत होत होती. यासह बैठकही झाली. महिला एसआय सतत पोलीस निरीक्षकावर लग्नासाठी दबाव आणत होती. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता, यामुळे निरीक्षक महिला एसआयशी बोलत नव्हता. रविवारी ही एसआय महिला निरीक्षकाच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली. त्याने निरीक्षकासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता निरीक्षकाने एसआयला मारहाण केली. तिला तिच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागला असे सांगून ही महिला एसआय आपल्या घरी परतली.उच्च अधिकाऱ्यांनी अहवाल मागितलाविभागीय असल्याने घाटमपूर कोतवाली समोरील सरकारी निवासस्थानी एका महिला एसआयला मारहाण  झाल्याची घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटमपूर कोतवालीचे पोलिस निरीक्षक व पोलिस काही बोलण्यास टाळाटाळ करू लागले, परंतु जेव्हा ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी घाटमपूरच्या पोलीस निरीक्षकाजवळ संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला.पोलीस निरीक्षकाचा बदलला सूरजेव्हा प्रेम प्रकरण प्रकरणाची माहिती उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली तेव्हा निरीक्षकाचा स्वर बदलला. पोलीस निरीक्षक आता अधिकाऱ्यांना सांगत आहेत की सर, आमचे लग्न लावून द्या. यासह निरीक्षक महिला एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. एसआयला तो म्हणत आहे की, मी लग्नासाठी तयार आहे, तू माझ्याशी लग्न करशील का?

घाटापूर कोतवाल धनेश प्रसाद यांचे म्हणणे आहे की, ही संपूर्ण बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जाईल. सध्या निरीक्षक लग्न करण्यास तयार आहे. तरीही महिलेला पोलिस अधिकाऱ्याविरोधात अहवाल नोंदवायचा असेल तर तिच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :marriageलग्नKanpur Policeकानपूर पोलीसPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश