शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

साहेब, न्याय पाहिजे!, भाचीचा कापलेला पाय घेऊन असहाय्य मामा पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 20:52 IST

Dowry Case :कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बिहारच्या भोजपूरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे, जो तुम्हाला हादरवेल. हुंड्यासाठी विवाहित मुलीला जाळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलीच्या जळालेल्या पायाचा काही भाग पुरावा म्हणून न्यायासाठी पोलीस ठाण्यात नेला. कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.हे धक्कादायक प्रकरण आराच्या मुफस्सिल पोलीस ठाण्यातील आहे. याच परिसरातील बरौली गावात हुंड्याच्या लोभापायी आरोपींनी आधी नवविवाहितेचा गळा आवळून खून केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडला. यानेही मन भरले नाही म्हणून त्यांनी मृतदेह जाळला. हा प्रकार मृताच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृताच्या अर्ध्या जळालेल्या पायावर सापडलेल्या पैंजणीवरून तिची ओळख पटवली.मोठ्या थाटामाटात लग्न झालेसंपूर्ण प्रकरण असे आहे.  मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या बाभनगवान येथील रहिवासी अखिलेश बिंद यांची मुलगी ममता देवी हिचा विवाह  मुफस्सिलच्या बरौली गावातील रहिवासी शत्रुघ्न बिंदसोबत मे २०२१ मध्ये झाला होता. ममताचे आई-वडील गुजरातमधील राजकोटमध्ये मजूर म्हणून काम करत होते, त्यामुळे ममता तिच्या मामाकडे बरौली गावात बराच काळ राहत होती. मे 2021 मध्ये, ममताचे मामा बिगन बिंद यांनी तिच्या भाचीचे लग्न गावातील शत्रुघ्न बिंदसोबत मोठ्या थाटामाटात केले.लग्नाच्या वेळी माहेरच्या लोकांनी शत्रुघ्न बिंडला हुंडा म्हणून पैसे आणि इतर वस्तूही दिल्या. असे असतानाही शत्रुघ्न हा ममताला लग्नानंतर तिच्या आई-वडिलांकडून एक लाख रुपये हुंड्याची मागणी करून त्रास देत असे. एक लाख रुपये न मिळाल्याने शत्रुघ्नने कुटुंबीयांसह ममताची आधी हत्या केली. चांडी पोलीस ठाण्याच्या सारीपूर-विशूनपूर सोन नदी घाटाजवळ त्यांचा मृतदेह प्रथम वाळूत पुरण्यात आला. नंतर मन बदलल्यानंतर मृतदेह वाळूतून बाहेर काढून जाळला आणि घटनास्थळावरून पळ काढला.पैंजणावरून ओळख पटवली आश्चर्याची गोष्ट म्हणजे ममताची हत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मृतदेह जाळण्यासाठी प्रवासी कार भाड्याने घेतली होती. मृतदेह वाळूमध्ये पुरल्यानंतर वाहन चालक वाहनासह परतला, मात्र तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी त्याला संशयावरून पकडले. दरम्यान, पोलिसांनाही माहिती देण्यात आली. येथे सासरच्या लोकांनी ममताचा मृतदेह वाळूतून काढून जाळण्यास सुरुवात केली आणि संधी पाहून आरोपींनी पळ काढला.ममताची हत्या करून तिचा मृतदेह सारीपूर सोन नदी घाटावर नेल्याची माहिती त्याच्या मामाला मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत मृतदेह जळाला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला नव्हता, त्यानंतर ममताचा अर्धा जळालेला पाय पाहून आणि तिच्या पायाच्या बोटात घातलेली मासोळी व पैंजाणीवरून तिच्या मामाने ममताला ओळखले  .तिघांविरुद्ध गुन्हा दाखलबुधवारी घडलेल्या या घटनेनंतर ममताचे मामा न्यायासाठी ममताचा अर्धा जळालेला पाय घेऊन मुफस्सिल पोलीस ठाण्यात पोहोचले, तेथे पोलिसांनी ममताच्या मामाच्या जबाबावरून ममताचा पती शत्रुघ्न बिंड आणि सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतकाचे मामा. पोलिसांनी पुरावा म्हणून आणलेला अर्धा जळालेला पाय डीएनए चाचणीसाठी पाटणा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

सध्या मुफस्सिल पोलीस ठाण्याचे पोलीस मृतदेह ताब्यात घेणाऱ्या चालकाची चौकशी करत असताना ममताचा पती आणि इतर सासरच्या मंडळींना अटकेची कारवाई करत आहे. मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच ममताचे आई-वडील गुजरातहून आरा येथे येत आहेत.या प्रकरणी पोस्टमॉर्टमसाठी आलेल्या मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या एसआयने कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही याप्रकरणी कॅमेरासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत.

टॅग्स :dowryहुंडाRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूBiharबिहार