शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:52 IST

Accident Case : गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - वरळी गाव बस आगारामध्ये दोन बेस्टच्या बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगारामध्ये बस नेत असताना चढणावरून बस खाली उतरल्यामुळे ही मुलगी दोन बसच्यामध्ये चिरडली गेली आणि रक्तबंबाळ झाली. प्रीती कोरी असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एका बेस्टच्या बस चालकाला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रीती कोरी ही मुलगी वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून मैत्रीणीसोबत ट्युशनला गेली होती. त्यावेळी तिची मैत्रीण मागे राहिली आणि मुलगी फोनवर बोलत पुढे आली होती. त्याचवेळी आगारामध्ये एक बेस्टची बस आत जात होती. तर दुसरी बस मागे उभी होती. अचानक पुढील बस चढणावरून मागेच्या बाजूने खाली उतरल्यामुळे दोन बसमध्ये ही मुलगी चिरडली गेली.

रक्तबंबाळ अवस्थेत जखमी मुलीला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३०४(अ) आणि निष्काळजीपणे बस चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. बसचालक गौतम सिद्धार्थ भालेराव(३०) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तो घाटकोपर येथील रहिवासी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक