शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

धक्कादायक ! मैत्रीण बोलली नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:55 IST

राजारामपुरीतील घटना : बारावीच्या पेपरनंतर कृत्य 

ठळक मुद्देमाहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे.. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते.

कोल्हापूर - मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्यांने राहत्या फलॅटमध्ये गफळास घेवून आत्महत्या केल्याची ºहदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७, रा. गोंदवले, ता. मान, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. माहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

पोलीसांनी सांगितले, श्रीराम कोळी हा चाटे स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याची बहिण तेजश्री बी. ई. मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. ती कोल्हापूरातच खासगी कंपनीत नोकरी करते. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते. श्रीरामची बारावीची परिक्षा सुरु आहे. तो हुशार होता. मंगळवारी त्याचा शेवटचा माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी बहिणीकडून तीनशे रुपये घेवून तो पेपरला गेला. जाताना त्याच्या चेहºयावर कुठलाही तणाव किंवा नैराश्य नव्हते. दूपारी पेपरहून आलेनंतर तीनच्या सुमारास बहिणीने त्याला फोन करुन पेपर कसा गेला याची विचापूस केली. त्याने चांगला गेला असे सांगुन फोन ठेवला. बहिण तेजश्रीने तो असे काही करुन घेईल असे स्वप्नातही पाहिले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली. दरवाजा आतून बंद होता. तिने श्रीरामला हाक दिली, परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीराम सिलींग फॅनला उटकत असल्याचे दिसून आले. हे दूष्य पाहून ती जागेवरच कोसळली. आरडाओरड करु लागल्याने आजूबाजूचे रहिवाशी आले. येथील काही तरुणांनी दरवाजा मोडून काढला असता श्रीरामने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकाराची वर्दी राजारामपूरी पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. श्रीरामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांना मिळून आली. भावाच्या विरहाने अक्रोश करणाºया तेजश्रीला माजी महापौर माळवी यांनी धीर दिला. 

श्रीरामचे वडील डॉक्टर आहेत. आई गृहीणी आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी बहिणीसोबत त्याला कोल्हापूरला पाठविले होते. त्याचा सर्वजण लाड खूप करीत. तो हुशारही होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडीलांना मानसिक धक्का बसला. नातेवाईकांसोबत ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीPoliceपोलिस