शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

धक्कादायक ! मैत्रीण बोलली नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:55 IST

राजारामपुरीतील घटना : बारावीच्या पेपरनंतर कृत्य 

ठळक मुद्देमाहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे.. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते.

कोल्हापूर - मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्यांने राहत्या फलॅटमध्ये गफळास घेवून आत्महत्या केल्याची ºहदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७, रा. गोंदवले, ता. मान, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. माहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

पोलीसांनी सांगितले, श्रीराम कोळी हा चाटे स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याची बहिण तेजश्री बी. ई. मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. ती कोल्हापूरातच खासगी कंपनीत नोकरी करते. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते. श्रीरामची बारावीची परिक्षा सुरु आहे. तो हुशार होता. मंगळवारी त्याचा शेवटचा माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी बहिणीकडून तीनशे रुपये घेवून तो पेपरला गेला. जाताना त्याच्या चेहºयावर कुठलाही तणाव किंवा नैराश्य नव्हते. दूपारी पेपरहून आलेनंतर तीनच्या सुमारास बहिणीने त्याला फोन करुन पेपर कसा गेला याची विचापूस केली. त्याने चांगला गेला असे सांगुन फोन ठेवला. बहिण तेजश्रीने तो असे काही करुन घेईल असे स्वप्नातही पाहिले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली. दरवाजा आतून बंद होता. तिने श्रीरामला हाक दिली, परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीराम सिलींग फॅनला उटकत असल्याचे दिसून आले. हे दूष्य पाहून ती जागेवरच कोसळली. आरडाओरड करु लागल्याने आजूबाजूचे रहिवाशी आले. येथील काही तरुणांनी दरवाजा मोडून काढला असता श्रीरामने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकाराची वर्दी राजारामपूरी पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. श्रीरामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांना मिळून आली. भावाच्या विरहाने अक्रोश करणाºया तेजश्रीला माजी महापौर माळवी यांनी धीर दिला. 

श्रीरामचे वडील डॉक्टर आहेत. आई गृहीणी आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी बहिणीसोबत त्याला कोल्हापूरला पाठविले होते. त्याचा सर्वजण लाड खूप करीत. तो हुशारही होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडीलांना मानसिक धक्का बसला. नातेवाईकांसोबत ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीPoliceपोलिस