शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

खाकीला सॅल्यूट! "या" कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे वाचले ८८ प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:59 IST

गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह  बोट सुटली होती.

ठळक मुद्देपोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे ८८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाश्यांच्या मदतीने ताबडतोब जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले.

मुंबई - अलिबागला निघालेली मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अजंठा कंपनीची प्रवासी बोट बुडाली. बोटीमध्ये ८८ प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने ८० जणांना वाचवले. तर अन्य ८ जणांना खासगी बोटीने वाचवण्यात यश आले आहे. मात्र, मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे ८८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाश्यांच्या मदतीने ताबडतोब जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे पोलिसासह दोन खलाशी हे त्याच्यासाठी देवदूतच ठरले.

ब्रेकिंग! मांडवा बंदरात प्रवासी बोट बुडाली; सुदैवानं सर्व प्रवासी सुखरुप

गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह  बोट सुटली होती. मांडावा बंदरा जवळ 200 मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोटीला खाली दगड लागल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तात्काळ पाठवून दिले. बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन प्रशांत घरत यांच्यासोबत जाऊन बुडणाऱ्या ८८ जणांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. मात्र, पोलिसाने दाखवलेल्या खबरदारीमुळे जलसमाधी मिळणाऱ्या ८८ जणांचा जीव वाचला. देवदूत बनलेल्या बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक घरत यांचे म्हणूनच कौतुक होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघातalibaugअलिबाग