शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

११ अल्पवयीन मुलींची सुटका; केरळातील धर्मगुरुकडून चालविले जात होते वसतीगृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:09 IST

मागील तीन वर्षे कोलव्यातील ते वसतीगृह बेकायदेशीररित्या सुरु होते

ठळक मुद्देसध्या झाकारिया याच्या विरोधात गोवा बाल कायद्याच्या ८ व ९ कलमाखाली गुन्हा नोंद करुन पुढील चौकशी चालू आहे.झाकारिया एक एन्जीओ संस्थाही चालवत असून ही संस्था कायदेशीर आहे की नाही याचाही पोलीस तपास करत आहेत.

मडगाव - मडगावपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवा परिसरात मागची तीन वर्षे एका केरळी धर्मगुरुकडून बेकायदेशीररित्या लहान मुलांचे वसतीगृह चालविले जात असल्याचे उघडकीस आले असून गोवा मानव तस्करी नियंत्रण विभागाकडून काल बुधवारी झालेल्या कारवाईत ४ ते १२ वर्षे वयोगटातील ११ मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. या धर्मगुरुच्या विरोधात गोवा बाल कायद्याखाली गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

गरीब घरांतील लहान मुलांना आसरा देण्याच्या बहाण्याने कोलव्यात उघडलेले हे वसतीगृह मागची तीन वर्षे बेकायदेशीररित्या कोलव्यातील एका बंगल्यात चालू होते. केरळातील प्रोटेस्टन्ट पंथाचा पास्टर (धर्मगुरु) बिजू झाकारिया हा चालवत होता. सदर झाकारिया एक एन्जीओ संस्थाही चालवत असून ही संस्था कायदेशीर आहे की नाही याचाही पोलीस तपास करत आहेत. क्राईम ब्रँचचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, कोलव्यातील एका बंगल्यात हे वसतीगृह चालू होते. गोवा बाल कायद्याप्रमाणो अशी वसतीगृहे नोंदणीकृत असणो आवश्यक आहे. मात्र कुठल्याही नोंदणीविना हे वसतीगृह चालू होते. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही आली होती. सध्या झाकारिया याच्या विरोधात गोवा बाल कायद्याच्या ८ व ९ कलमाखाली गुन्हा नोंद करुन पुढील चौकशी चालू आहे.

बुधवारी पणजीच्या मानव तस्करी नियंत्रण कक्षाने या वसतीगृहावर छापा मारत ४ ते १२ वर्षे वयोगटातील ११ मुलींना ताब्यात घेतले होते. सध्या या मुलींना मेरशीच्या अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. या वसतीगृहात केवळ मुलींनाच ठेवण्यात येत होते की मुलांनाही याचाही पोलीस शोध घेत आहेत. ज्या ११ मुलींची या वसतीगृहातून सोडवणूक केली आहे. ती सर्व मुले गरीब कामगार वर्गाची असून या वसतीगृहाबद्दल चर्चच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली होती अशी माहिती या पालकांनी पोलिसांना दिली आहे. आमच्या मुलांचे चांगल्याप्रकारे संगोपन व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठीच आम्ही त्यांना या वसतीगृहात ठेवले होते, अशी माहिती या पालकांनी पोलिसांना दिली आहे. अधीक्षक पंकजकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, सीडब्ल्यूसीकडे आम्ही संपर्क साधला असून ताब्यात घेतलेल्या मुलींचा ताबा कुणाकडे द्यावा या संबंधात ही समिती निर्णय घेणार आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ ते ६ पालकांचे जबाब आम्ही नोंद करुन घेतले असून या जबान्यातील सत्यता पोलीस पडताळून पहात आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसgoaगोवाCrime Newsगुन्हेगारी