शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मुलीच्या भविष्यासाठी गाठली मुंबई...अन् अडकली दलालांच्या सौदेबाजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:50 IST

पोलिसांमुळे तरुणीची नरकयातनेतून सुटका; बालवयातच सोसल्या यातना

मनीषा म्हात्रेमुंबई : लहानपणीच आई-वडील विभक्त झाले. आधार ठरलेल्या आजीने कोवळ्या वयातच हात पिवळे करून  जबाबदारी पार पाडली. वयाच्या १६ व्या वर्षी मातृत्व तिच्या पदरात पडले. मुलीच्या जन्मानंतर पतीनेही साथ सोडली. आपल्या नशिबी आलेले भोग पोटच्या मुलीच्या नशिबी येऊ नयेत म्हणून नोकरीच्या शोधात तिने कोलकाता गाठले. मात्र, तेथे वेश्याव्यवसायात अडकली. तेथून सुटका होऊन नोकरीच्या आशेने, मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने मुंबई गाठली आणि येथेही मायानगरी मुंबईच्या रेड लाइट खोलीत ती बंद झाली. बांगलादेशी म्हणून अटकेची भीती घालत डांबून ठेवत दलालांनी तिच्या शरीराचे रोज सौदे केले. अखेर, तिची मुंबई पोलिसांनी या नरकयातनेतून सुटका केली.  बांगलादेशमधील दादरा गावात राहणाऱ्या २० वर्षीय रेश्माची (नावात बदल) ही आहे कहाणी. अवघी सात वर्षांची असताना आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. वडिलांसोबत राहत असताना त्यांनीही दुसरे लग्न करून घरातून हाकलून दिले. आजी- आजोबांचा रेश्माला आधार मिळाला. शिक्षणासोबतच शिवणकाम सुरू करून तिनेही आजी-आजोबांना आर्थिक आधार दिला. आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आजीने विवाह लावून देत आपले कर्तव्य पार पाडले. लग्नाच्या पहिल्या वर्षीच मुलगी झाली आणि पतीनेही दुसऱ्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून रेश्माला सोडले. लहान मुलगी पदरात असल्याने तिला पुन्हा आजीचा आधार घ्यावा लागला. मुलीच्या चांगल्या संगोपनासाठी ढाका परिसरात कामाच्या शोधात असताना काही महिलांनी तिला चांगले पैसे मिळतील असे सांगत आपल्या सोबत टुरिस्ट पासपोर्टवरून कोलकातामध्ये आणले.

येथे पहिल्यांदा रेश्माला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. मात्र, टुरिस्ट पासपोर्ट संपल्याने या नरकयातनेतून सुटका होऊन ती पुन्हा बांगलादेशला परतली; पण आठवडाभरातच दलालांनी पुन्हा तिला बेकायदा कोलकातामध्ये आणले. दोन वर्षे तेथे वास्तव्यास असताना मैत्रीण माधवी दास हिच्या आई-वडिलांच्या नावाने भारतातील आधार कार्ड बनवून दिले. मुंबईत चांगले काम मिळेल. जास्त पैसे मिळतील, असे सांगून एका महिलेने तिला दलाल सोनू कुमार याच्यासोबत जाण्यास सांगितले. रेश्माने २१ मार्च रोजी मैत्रीण माधवीसोबत मुंबई गाठली. 

अखेर अत्याचाराला वाचा फुटलीसंस्थेतील अधिकरी महिलेने तिला विश्वासात घेत चौकशी केली आणि रेश्माने आपल्यावर बेतलेल्या नरकयातनांना आवाज फोडला. संस्थेने ९ डिसेंबर रोजी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, रेश्माच्या तक्रारीवरून कुंटणखाना चालक रवींद्र, अशोक व सोनू कुमारविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करून अधिक तपास सुरू असल्याचे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी सांगितले.

पळ काढला आणि मागितली मदतसोनू कुमारने तिला नागपाडा येथील एका हॉटेलमध्ये आणून डांबले. पोलीसवाले चेकिंग कर रहे है, सेक्शन गरम है, बांगलादेशी हो, अरेस्ट होगी... असे घाबरवत त्याने रेश्माच्या शरीराची सौदेबाजी सुरू केली. त्यातला एक छदामही रेश्माला दिला नाही. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगले काम मिळेल या एका भाबड्या आशेपोटी ती या नरक यातना सहन करत होती. अखेर, बनारस चाळीमधील एका किचनमध्ये काही दिवस डांबल्यानंतर तिने तेथून पळ काढला. पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, खरी ओळख सांगितली नाही. तिच्याकडे कागदपत्रे नसल्याने, तसेच लहान वाटत असल्याने तिला डोंगरी येथील चिल्ड्रन होम येथे नेले, तेथून कांदिवलीतील होम चिल्ड्रनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी