शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

"देशात बलात्कार, हत्या, अपहरणाच्या, जातीय दंगलीच्या घटना घटल्या"; गृहमंत्रालयाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 11:39 IST

Crime News : सरकार सर्व गुन्ह्यांच्या नोंदींचं डिजिटलीकरण करणार असल्याचंही राज्यसभेत सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत देशातील बलात्कार आणि जातीय दंगली घटना कमी झाल्या आहेत अशी माहिती दिली आहे. तसेच सरकार सर्व गुन्ह्यांच्या नोंदींचं डिजिटलीकरण करणार असल्याचंही राज्यसभेत सांगण्यात आलं आहे.

जातीय दंगलींना आळा

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लिखित उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशातील जातीय दंगलींच्या संख्येत घट झाली आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी 2019 मध्ये या प्रकारचे 440 प्रकरणे दाखल करून घेतले. 2018 मध्ये या गुन्ह्यांची संख्या 512 होती.

बलात्कारांच्या घटनाही झाल्या कमी

बलात्कार, हत्या आणि अपहरणाच्या घटनाही कमी झाल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. 2019 मध्ये देशात बलात्काराच्या 32,033, हत्येच्या 28, 918 आणि अपहरणाच्या 1,05,037 घटना घडल्या. 2018 मध्ये बलात्काराच्या 33,356, हत्येच्या 29,017 आणि अपहरणाच्या 1,05,734 घटना घडल्या.

देशात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांचे डिजिटलीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. Crime and Criminal Tracking Network and Systems वर आतापर्यंत 30.81 कोटी आकडे उपलब्ध करून देण्यात आल्याचंही गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशातून सर्वाधिक घुसखोरी

2018 ते 2020 दरम्यान, भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. या काळात पाकिस्तानातून 116, बांगलादेशातून 2812 आणि म्यानमारमधून 325 लोकांनी घुसखोरी केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

डिजिटल जनगणना होणार

देशात 2021मध्ये डिजिटल जनगणना होणार आहे. ही देशातील पहिली डिजिटली जनगणना असेल असं नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे. या जनगणनेसाठी 8754.23 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

इंटरनेट शटडाऊनची संख्या नाही

देशात किती वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आला असा सवाल केंद्राला विचारण्यात आला होता. मात्र केंद्राकडे त्याचं उत्तर नाही. दंगल किंवा तणावाच्या स्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी