शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या प्रवासी बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; 6 जणांचा मृत्यू, काही भाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:57 IST

Bus accident : बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती.

राजस्थानमध्ये विचित्र आणि तेवढीच भयावह दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री एक आराम बस विद्युतभारीत तारेच्या संपर्कात आल्याने बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जवळपास २० हून अधिक प्रवासी होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी शर्मा यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा अपघात जालौर जिल्ह्याच्या महेशपुरा गावामध्ये झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जोधपूरला पाठविण्यात आले आहे. तसेच १३ जणांवर जिल्हा हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत. बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती. गावातील ११ केव्हीच्या विद्युतभारीत तारेला बसच्या टपाचा स्पर्श झाला. यामुळे बसला आग लागली. तसेच वीजही प्रवाही झाली. 

स्थानिकांनी वीज वितरण विभागाला माहिती देत वीज बंद करायला लावली. यानंतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिसांनाही बोलावले. 

खासदार देवजी पटेल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसRajasthanराजस्थानelectricityवीज