शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या प्रवासी बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; 6 जणांचा मृत्यू, काही भाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:57 IST

Bus accident : बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती.

राजस्थानमध्ये विचित्र आणि तेवढीच भयावह दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री एक आराम बस विद्युतभारीत तारेच्या संपर्कात आल्याने बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जवळपास २० हून अधिक प्रवासी होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी शर्मा यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा अपघात जालौर जिल्ह्याच्या महेशपुरा गावामध्ये झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जोधपूरला पाठविण्यात आले आहे. तसेच १३ जणांवर जिल्हा हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत. बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती. गावातील ११ केव्हीच्या विद्युतभारीत तारेला बसच्या टपाचा स्पर्श झाला. यामुळे बसला आग लागली. तसेच वीजही प्रवाही झाली. 

स्थानिकांनी वीज वितरण विभागाला माहिती देत वीज बंद करायला लावली. यानंतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिसांनाही बोलावले. 

खासदार देवजी पटेल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसRajasthanराजस्थानelectricityवीज