शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पोस्टमॉर्टम रॅकेटचा भांडाफोड, बनावट कागदपत्रांद्वारे लाटायचे विम्याचे लाखो रुपये; 15 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:04 IST

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये डॉक्टर, पोलिस, वकील आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश

जयपूर: आत्तापर्यंत तुम्ही विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अनेक टोळ्यांबद्दल ऐकलं असेल, पण तुम्ही कधी पोस्टमॉर्टम टोळीबद्दल ऐकलं आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरंय. एक नाही तर अशी अनेक प्रकरणे राजस्थानच्या दौसामधून समोर आली आहेत, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. पण, या टोळीने बनावट पोस्टमार्टम अहवाल सादर करुन त्या लोकांच्या नावाने 10-10 लाख रुपयांचा क्लेम/विमा उचलला आहे. या बनावट पोस्ट मॉर्टम टोळीशी संबंधित 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वकील, पोलीस, डॉक्टर आणि कंपनीतील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये दिल्लीचा रहिवासी असलेल्या अरुण नावाच्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास अधिकारी रमेश चंद, शवविच्छेदन करणारे डॉक्टर सतीश गुप्ता आणि वकील चतुर्भुज मीना यांनी अरुण जिवंत असूनही त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवलं. तसेच, बनावट पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तयार करुन अरुणच्या नावाने दहा लाख रुपयांचा विमा उचलला. पण, नंतर तपासात अरुणचा मृत्यू झाला नसल्याचं आढळून आलं.

तपासात अनेक प्रकरणे बाहेर आली

अरुणच्या बनावट पोस्टमार्टमचे प्रकरण पोलिसांनी 2019 मध्येच उघड केले. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर, पोलीस कर्मचारी, वकील यांना अटक केली होती. यानंतर पोलिसांना अधिक तपासात एक नाही तर अशीच अनेक प्रकरणे आढळून आली. या सर्व प्रकरणांमध्ये अपघात झाला नसला तरी कागदपत्रांमध्ये रस्ते अपघात दाखवण्यात आला आहे आणि त्या व्यक्तीला मृत असल्याचे सांगून बनावट शवविच्छेदन देखील करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणांची सीआयडी, सीबी आणि जयपूर रेंज आयजी कार्यालयाकडूनही चौकशी करण्यात आली. प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी एकूण 3 प्रकरणांचा खुलासा केला आहे.

15 आरोपींना अटक इतरांचा शोध सुरू

पोलिसांनी या प्रकरणांमध्ये आरोपी डॉ. सतीश गुप्ता, पोलिस एएसआय रमेश चंद, वकील चतुर्भुज मीणा याच्यासह एकूण 15 जणांना अटक केली आहे. या तीन मुख्य आरोपींना 2019 मध्ये देखील अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, जामिनावर बाहेर आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने व्हीआरएस घेतली तर डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले. पण, आता पुन्हा एकदा पोलिसांनी त्याला इतर प्रकरणांमध्ये अटक केली आहे. अजूनही 8 आरोपी फरार आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस