शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ई-क्लासच्या जागेवरून चौघा भावंडात वाद, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By निलेश जोशी | Published: May 08, 2024 7:43 PM

साखरखेर्डा येथील घटना : मारहाण झालेले तिघेही गेले होते कोमात

साखरखेर्डा: मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावानजीक असलेल्या ई-क्लासच्या जागेवरून चौघा भावंडामध्ये वाद होऊन १९ एप्रिल रोजी तुंबळ हाणामारी होऊन तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान यातील एकाचा रुग्णालयात उपाचारदरम्यान ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव एकनाथ सिताराम टाले (३०) असे आहे. साखरखेर्डा येथील सिताराम टाले यांना सात मुले आहे. 

३५ वर्षापूर्वी सिताराम टाले यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रामदास, भानुदास, देविदास, हरिभाऊ, पांडुरंग, अंबादास, एकनाथ या सातही मुलांचा त्यांच्या आईने मोलमजुरी करून सांभाळ केला होता. दरम्यान रामदास, भानुदास, अंबादास आणि देविदास हे मोलमजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले होते. तर लहान भावंडांनी महालक्ष्मी तलावाच्या काठावरील ई-क्लास जमिनीवर धाबा टाकून व्यवसाय सुरू केला होता. तिघांचेही विवाह झाले होते. दरम्यान या व्यवसायावर देविदास टाले यांची नजर होती. 

धाब्याची जागा आपल्यालाच हवी अशी मागणी करत त्यांनी तिघाही लहान भावंडांना धमक्या देण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे तिघांनीही जागा तुम्हाला देतो वाद करू नका असे सांगितले होते. परंतू १९ एप्रिल रोजी देविदास टाले यांनी त्यांच्या दोन मुलांना सोबत घेऊन तिघाही लहान भावंडासोबत वाद केला. बेसावध असलेल्या हरिभाऊ, पांडुरंग आणि एकनाथ यांना त्यांनी जबर माहाण केली. तिघांनाही बेशुद्धावस्थेत चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान यातील एकनाथ टाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

या प्रकरणात ७ मे रोजीच साखरखेर्डा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह गंभीर माराहण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले असतांनाच ही घटना घडली. ३० एप्रिल रोजी या प्रकरणात पांडुरंग टाले यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी देविदास सिताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान एकनाथ टाले यांचा ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार स्वपनील नाईक यांनी सांगितले. प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास सिताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा