शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 23:59 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून महिला होती बेपत्ता

येरवडा: तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळला. गीता राजेश कुंभार (वय ४६, रा. ठाकरसी हिल पाण्याच्या टाकीजवळ, तारकेश्वर मंदिर पायथा येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तारकेश्वर टेकडी येथील जडपामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ भेट दिली असता महिला तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ असणाऱ्या ठाकरसी हिल पाण्याची टाकी येथील राहणारी असल्याची माहिती मिळाली.

गीता कुंभार या मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्टीने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्या घरात होत्या, मात्र मध्यरात्री नंतर त्या घरातून बेपत्ता झाल्या. दोन दिवस कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी दुपारी येरवडा पोलीस स्टेशन येथे त्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह पर्णकुटी पायथा येथील झाडीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट दिली. श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

तारकेश्वर मंदिर हा परिसर पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेजारीच असणारा ऐतिहासिक  ठाकरसी बंगला तसेच शेजारी असणारी पुणे महापालिकेची ठाकरसी पाण्याची टाकी असा विस्तृत परिसर या ठिकाणी आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली दिसून येत नाही. धार्मिक स्थळ खाजगी बंगला तसेच महापालिका क्षेत्र या तीनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागांमुळे सदर ठिकाणी सुरक्षितता महत्त्वाची आहे. परिसरात अनेक अपप्रवृत्तीचे लोक मद्यपानासह गैरप्रकार करत असतात. पूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच ठोस उपाय योजना न केल्यामुळे असे गंभीर प्रकार वारंवार घडत आहेत. असे गंभीर दुर्दैवी प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी लोकांची भावना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाPuneपुणेPoliceपोलिस