शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 23:59 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून महिला होती बेपत्ता

येरवडा: तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळला. गीता राजेश कुंभार (वय ४६, रा. ठाकरसी हिल पाण्याच्या टाकीजवळ, तारकेश्वर मंदिर पायथा येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तारकेश्वर टेकडी येथील जडपामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ भेट दिली असता महिला तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ असणाऱ्या ठाकरसी हिल पाण्याची टाकी येथील राहणारी असल्याची माहिती मिळाली.

गीता कुंभार या मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्टीने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्या घरात होत्या, मात्र मध्यरात्री नंतर त्या घरातून बेपत्ता झाल्या. दोन दिवस कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी दुपारी येरवडा पोलीस स्टेशन येथे त्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह पर्णकुटी पायथा येथील झाडीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट दिली. श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

तारकेश्वर मंदिर हा परिसर पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेजारीच असणारा ऐतिहासिक  ठाकरसी बंगला तसेच शेजारी असणारी पुणे महापालिकेची ठाकरसी पाण्याची टाकी असा विस्तृत परिसर या ठिकाणी आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली दिसून येत नाही. धार्मिक स्थळ खाजगी बंगला तसेच महापालिका क्षेत्र या तीनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागांमुळे सदर ठिकाणी सुरक्षितता महत्त्वाची आहे. परिसरात अनेक अपप्रवृत्तीचे लोक मद्यपानासह गैरप्रकार करत असतात. पूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच ठोस उपाय योजना न केल्यामुळे असे गंभीर प्रकार वारंवार घडत आहेत. असे गंभीर दुर्दैवी प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी लोकांची भावना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाPuneपुणेPoliceपोलिस