शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फाउंटन हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 21:55 IST

ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती. गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

मीरारोड - पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील मुलांना दुचाकी लावण्यावरुन फाऊंटन हॉटेलच्या बाऊंसर, कर्मचारायांनी केलेल्या मारहाणी वरुन उसळलेल्या दंगलीचे संतपत पडसाद आगरी समाजात उमटले आहेत. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला. हॉटेल मालक भाजपाचा असल्याने पोलीस आणि पालिका त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आगरी समाज दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील वरसावे नाका येथे असलेल्या फाऊंटन हॉटेलवर पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील तरुणांना त्यांची दुचाकी उभी करण्यावरुन हॉटेलचे बाऊंसर, रखवालदार आदींनी शिवीगाळ करत दमदाटी, मारहाण केली. याची माहिती गावात कळताच गावातील रहिवाशी हॉटेलवर गोळा झाले. तर हॉटेलचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने जमले होते. वादावादी वाढत जाऊन त्याचे पर्यवसन तुंबळ हाणामारी, दगडफेक, सोडा वॉरच्या बाटल्या फेकण्यात झाले. यात ग्रामस्थांसह एक पोलीस जखमी झाला. पोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती.दरम्यान या घटनेचे पडसाद आगरी समाजात उमटले. आज सोमवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासह आगरी समाजाचे प्रमुख शांताराम ठाकुर, सुरेश पाटील, प्रभाकर म्हात्रे, केशव घरत, चिंतामण पाटील, राजु ठाकुर तसेच मोठ्या संख्येने पालघर - ठाण्याचे आगरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घातला.या वेळी फाऊंटन हॉटेलचा मालक तलाह मुखी स्वत: घटनेत सहभागी असल्याचे सांगत मुखी हा भाजपाचा असल्याने त्याला पोलीस, पालिका आदी संरक्षण देत असल्याचा आरोप आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी केला. सदर हॉटेल आदिवासींच्या जागेवर असुन बेकायदा बांधकाम आणि खोट्या परवानग्या घेतल्या आहेत. यांचेच दिल्ली दरबार इन हे गॅरेजच्या परवानगीच्या नावाखाली घोडबंदर येथेच बेकायदा हॉटेल आहे. रात्रभर ही हॉटेलं कशी चालतात ? असा सवाल करत या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले.पानखाण्यासाठी गेलेल्या गावातील मुलांना केवळ दुचाकी उभी करण्या वरुन इतकी गुंडगीरी करणाराया हॉटेलवाल्याकडे शस्त्रे आली कुठून याचा शोध घ्या. हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा. गावातील मुलांना गंभीर जखमा झाल्या असुन त्यानुसार कलमं लावा, गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे, काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आगरी समाज व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकुन घेतले. यावेळी पोलीस कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे वळवी यांनी आश्वास्त केले. जखमींचे वैद्यकिय अहवाल येतील त्या प्रमाणे कलमं लावली जातील. कायद्या नुसार कारवाई करु अशी ग्वाही वळवी यांनी दिली. पोलीसांनी या प्रकरणात एकुण तीन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आणि ग्रामस्थांच्यावतीने तसेच हॉटेल चालकाच्यावतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :mira roadमीरा रोडhotelहॉटेलPoliceपोलिस