शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 6:55 PM

फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती.

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा स्पष्ट आरोप भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. पाकिस्तानने या प्रकरणात व्हिएन्ना करार पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी अशी मागणी भारतने केली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्ट ह्याच महिन्यात निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलभूषण जाधव प्रकरणी येत्या काही आठवड्यात निकाल येण्याची शक्यता असून याबाबत तोंडी माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. 

कसं घेतलं कुलभूषण यांना पाकिस्तानने ताब्यात ?

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून मार्च २०१६ मध्ये भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात येऊन ताबडतोब एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. भारताने प्रचंड दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण यांच्या पत्नी व आईला त्यांना भेटण्याची परवानगी दिली. या भेटीच्या वेळीही दोघींना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानच्या या जुलुमाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन पाकिस्तानचे नाक दाबले. या खटल्यात भारताची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानला बेनकाब केले. व्हिएन्ना करारानुसार एखाद्या परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला उच्चस्तरीय मदत देण्यात यावी, कायदेशीर बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असा जागतिक करार करण्यात आला आहे. पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन करून कुलभूषण यांना कोणत्याही प्रकारे बचावाची संधी दिली नाही. कुलभूषण जाधव हे दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा एकही पुरावा पाकिस्तानला देता आला नाही. कुलभूषण यांचा कबुलीजबाबही दबावाखाली घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली होती. या खटल्याचा निकाल लवकरच ह्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने भारताचे लक्ष आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयPakistanपाकिस्तान