शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

By पूनम अपराज | Published: August 20, 2018 4:51 PM

फरार आरोपी असलेल्या अविनाशच्या मित्राला पकडण्यासाठी पोलीसांची तयारी 

मुंबई -  २०११ सालच्या आंबोली येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य साक्षीदार असलेल्या अविनाश सोलंकी उर्फ बालीचा (वय - ३८)  मृतदेह अंधेरी पूर्वेतील महाकाली केव्ह्ज रोडवरील अपोलो इंडस्ट्रिअल इस्टेटमधील गाळा क्रमांक ३४ मध्ये  सापडला आहे. अविनाश हा पोलिसांचा गेल्या २० वर्षांपासून अत्यंत महत्वाचा खबरी होता. त्याच्या डोक्यावर, पोटावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूने प्रहार केल्याचे अविनाशच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून दिसून येत होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून फरार दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अविनाशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

आंबोली येथे २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते आणि शहरात एकाच खळबळ माजली होती. या दुहेरी हत्याकांडात अविनाश हा मुख्य साक्षीदार होता. त्याने या प्रकरणात शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच या प्रकरणातल्या चार आरोपींना २०१६ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली. ही हत्या चार जणांनी केली होती. जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक तिवल अशी या चौघांची नावे होती. या चौघांनी किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांनाही चाकू हल्ला करून ठार केले होते. या दोघांवरही अनेक वार करण्यात आले होते. हे दोघेही गंभीर जखमी असताना त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. किनानचा मृत्यू या घटनेनंतर रूग्णालयात दाखल करतानाच झाला, तर रियुबनचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेताना काही दिवसांनी झाला. या प्रकरणात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता. तसेच २००९ साली झालेल्या दिवंगत चकमक फेम विजय साळसकर यांचा खबरी इरफान मकबूल हसन खान उर्फ इरफान चिंदी याच्या खूनप्रकरणी देखील अविनाशने साक्षीदार म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. पोलिसांचा खबरी म्हणून अविनाशचे गुन्हे शाखेतील अनेक पोलिसांशी चांगले संबंध होते. 

वाईट संगतीमुळे झाला खून ?

दहा वर्षांपूर्वी अविनाशच्या एका मित्राला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. पाहिजे आरोपी  सध्या जामीनावर बाहेर असून अविनाश आणि त्याची चांगली मैत्री आहे. त्या मित्राला अमली पदार्थाचे व्यसन असून मित्राच्या कौटुंबिक कलहात अविनाश मध्यस्थी म्हणून भूमिका पार पडायचा. मात्र, नेमकं अविनाश आणि त्याच्या मित्रामध्ये असं काय घडलं कि ज्यामुळे अविनाशच्या खून झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, पोलीसांचा प्राथमिक अंदाज हा अविनाशच्या खून मित्रानेच केला असल्याचा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच हा पाहिजे आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

२०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत अधिक महिती... चौघांना आजन्म कारावास

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईAndheriअंधेरीMurderखूनPoliceपोलिस