शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रस्त्यांची दुरावस्था पोलिसांना बघवेना! भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:53 IST

Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले.

ठळक मुद्देपावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात.

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून तेथील सर्वच रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे वेळ आल्याने भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

            

पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात.  मात्र रस्त्यांवर खड्यांचे  साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने  वाहतूक पोलिसांना या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनीच भिवंडी  शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे. 

         

भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते.  मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.  मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी , कशेळी ते अंजुर फाटा व  मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसान देखील खड्ड्यांमुळे होत असल्याने  याला  सर्वस्वी जबाबदार  वाहतूक पोलिसांना नागरिक  ठरवतात.  त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी की, रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

               

पंधरा दिवसापूर्वी  मनसैनिकांनी खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता.  तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या  संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गावरून काढण्यात आली.  त्यावेळेस तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते.  मात्र त्याही रस्त्यांवर खड्ड्यांनी डोके वर काढले आहेत.  त्यामुळेच वाहतूक पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbhiwandiभिवंडीPoliceपोलिसPotholeखड्डे