शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

रस्त्यांची दुरावस्था पोलिसांना बघवेना! भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:53 IST

Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले.

ठळक मुद्देपावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात.

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून तेथील सर्वच रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे वेळ आल्याने भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

            

पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात.  मात्र रस्त्यांवर खड्यांचे  साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने  वाहतूक पोलिसांना या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनीच भिवंडी  शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे. 

         

भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते.  मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.  मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी , कशेळी ते अंजुर फाटा व  मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसान देखील खड्ड्यांमुळे होत असल्याने  याला  सर्वस्वी जबाबदार  वाहतूक पोलिसांना नागरिक  ठरवतात.  त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी की, रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

               

पंधरा दिवसापूर्वी  मनसैनिकांनी खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता.  तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या  संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गावरून काढण्यात आली.  त्यावेळेस तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते.  मात्र त्याही रस्त्यांवर खड्ड्यांनी डोके वर काढले आहेत.  त्यामुळेच वाहतूक पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbhiwandiभिवंडीPoliceपोलिसPotholeखड्डे