शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Palghar mob lynching case: वर्षभरानंतरही गडचिंचले साधू हत्याकांडाचा तपास सुरूच, चोर समजून साधूंची झाली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:51 AM

Palghar mob lynching case: लाॅकडाऊन काळात हे साधू मुंबईच्या कांदिवलीवरून सुरत येथे अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना रात्रीच्या वेळी गडचिंचले येथे घडली होती.

- शशिकांत ठाकूर

कासा : पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांचा चालक यांना चोर समजून जमावाने त्यांची हत्या केल्याने राज्यासह देशभर त्याचे पडसाद उमटले होते. या घटनेला १६ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, या प्रकरणात एकूण २८८ जणांना अटक केली असून, त्यामध्ये २० जण अल्पवयीन होते, तर आतापर्यंत एकूण १९४ आरोपींना जामीन झाला असून, अद्याप तपास सुरू आहे.डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशालगत असलेल्या दुर्गम भागातील गडचिंचले येथे रात्रीच्या वेळी १६ एप्रिल रोजी चोर समजून कल्पवृक्षगिरी महाराज (७०), सुशीलगिरी महाराज (३५), या दोन साधू आणि त्यांचा चालक नीलेश तेलवडे (३०) यांची २५० ते ३०० जणांच्या जमावाने पोलिसांसमक्ष निर्घृण हत्या केली होती. यानंतर २० एप्रिलला कोकण पोलीस महानिरीक्षकांनी साधूंची हत्या रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून तात्काळ कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. २८ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाण्यातील आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले गेले, तर ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात बदली करण्यात आली.लाॅकडाऊन काळात हे साधू मुंबईच्या कांदिवलीवरून सुरत येथे अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना रात्रीच्या वेळी गडचिंचले येथे घडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व पोलीस यंत्रणेवर झालेले आरोप यामुळे घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. 

जंगलात लपलेल्या आरोपींचा ड्रोनच्या साहाय्याने तपासपोलिसांनी सुरुवातीला ११० आरोपींना पकडले; परंतु परिसरात जंगल असल्याने इतर आरोपी आजूबाजूच्या जंगलात लपले होते. त्यामुळे त्यांचा शोध ड्रोनच्या साह्याने घेण्यात आला. यावेळी गडचिंचले गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल करण्यात आला होता. गावाला छावणीचे स्वरूप आले होते. १३ मे रोजी सदर खटल्यात भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी हे साधूच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी डहाणू येथे न्यायालयात येत असताना महामार्गावर मेंढवण येथे अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :palgharपालघरLynchingलीचिंग