शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:31 IST

रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे. 

ठळक मुद्देपत्रात रोहतक, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. मागील गुरुवारी जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी कठुआ येथे जैशच्या तीन आतंकवाद्यांना शस्त्र साठा आणि स्फोटकांसह अटक केली होती.

नवी दिल्ली - जैश - ए - मोहम्मदचे आतंकवादी देशातील मोठ्या आणि खूप वर्दळीच्या रेल्वे स्थानकांना आणि मंदिरांवर हल्ला घडवून आणू शकतात. हरियाणा येथील रोहतक रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्याला शनिवारी अशा आशयाचे धमकीचे पत्र मिळाले आहे. पाकिस्तानमधील जैशच्या दहशतवाद्यांनी हे धमकीचे पत्र पाठविले असल्याचे तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. पत्रात रोहतक, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांना मिळालेलं हे पत्र पोष्टाने पाठविण्यात आलं आहे. त्यावर जैश - ए - मोहम्मदच्या मसूद अझहरची सही असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रात ८ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकं आणि मंदिरांवर हल्ला घडवून आणून मेलेल्या आतंकवाद्यांच्या बदला घेणार असल्याचं नमूद आहे. मागील गुरुवारी जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी कठुआ येथे जैशच्या तीन आतंकवाद्यांना शस्त्र साठा आणि स्फोटकांसह अटक केली होती. ट्रकमधून हे आतंकवादी पंजाबमधील अमृतसर घाटी येथे जात होते. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेलं कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानी आतंकवादी भारतावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. गुजरातमधील कच्छमध्ये एक संशयित बोट लष्कराला सापडली होती. त्यानंतर नौदल प्रमुखांनीही समुद्रमार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. रोहतक रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार हे पत्र रोहतक रेल्वे जंक्शन अधीक्षकांच्या नावे पाठवण्यात आले आहे. स्थानक व्यवस्थापकांना शनिवारी ३ वाजता हे पत्र मिळाले. या पत्रावर मसूद अहमद याने पाकिस्तानमधील कराचीतून पाठवल आहे असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाrailwayरेल्वेHaryanaहरयाणाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद