शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:01 IST

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले.

मुंबई - राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई झाली आहे. घुसखोरांविरोधात २ शहरांमध्ये एसआयटी तपासणी सुरू आहे. अनेकांकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाच्या चौकटीत अनेक सरकारी अधिकारी आणि नेतेही आहेत. व्होटबँकसाठी बनावट कागदपत्रे बनवले जातात. ही कागदपत्रे बनवण्यामागे मोठं रॅकेट आहे जे बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या विविध शहरांमध्ये स्थायिक करण्याचं कट रचत आहेत.

बरेच बांगलादेशी घुसखोर असे आहेत जे मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच विविध रहस्य समोर येत आहेत. या घुसखोरांकडून पोलिसांना मिळणारी माहिती धक्कादायक आहे. अखेर या घुसखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, दिल्लीतही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई झाली होती. दिल्लीच्या कालिंजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार इथं घुसखोरांची शोध मोहिम सुरू होती. दिल्ली पोलिसांनी बऱ्याच घुसखोरांना पकडून पुन्हा बांगलादेशात पाठवले.

महाराष्ट्रात ज्या लोकांना पकडले, हे लोक मुंबईत गेली कित्येक वर्ष राहत होते. त्यांच्याकडे ती सगळी कागदपत्रे होती जी भारतीय नागरिकाकडे असतात परंतु हे सर्व बांगलादेशी घुसखोर असल्याचं सत्य समोर आले. आपली ओळख पटवण्यासाठी या लोकांनी जी कागदपत्रे पोलिसांना दाखवली ती सर्व बनावट असल्याचं सिद्ध झाले. त्यात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसह पासपोर्टही आहे. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांचे सिंडिकेट आहे. प्रत्येक बोगस कागदपत्रासाठी रेट ठरलेले आहेत. 

बनावट आधार कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट रेशन कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट महाराष्ट्र अधिवास - १० ते १५ हजार रुपयेबनावट पॅन कार्ड - ५ ते १० हजार रुपये

जर एखाद्या घुसखोराला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला ५० ते १ लाख रुपये द्यावे लागतात. पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. फोन रेकॉर्डमधून व्हॉट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मिडिया एप्समधून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्कात असतात. मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवली आहे. तिथेही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाल्याचं समोर आले आहे. मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनी, गणपत पाटील नगर, मालवणी, दहिसर इथल्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर सापडले. नवी मुंबईत पनवेल, नेरुळ, उरण परिसरात १२ ते १५ हजार घुसखोर आढळले आहेत. 

दरम्यान, २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी १४७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली त्यातील २१ जणांना बांगलादेशात पाठवले. मागील ३ वर्षात बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱअया ९२८ बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशी घुसखोरांचे नेटवर्क केवळ बनावट कागदपत्रे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वास्तव्य करण्यापुरते मर्यादित नाही. घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांना शोधणे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसBangladeshबांगलादेश