शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:01 IST

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले.

मुंबई - राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई झाली आहे. घुसखोरांविरोधात २ शहरांमध्ये एसआयटी तपासणी सुरू आहे. अनेकांकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाच्या चौकटीत अनेक सरकारी अधिकारी आणि नेतेही आहेत. व्होटबँकसाठी बनावट कागदपत्रे बनवले जातात. ही कागदपत्रे बनवण्यामागे मोठं रॅकेट आहे जे बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या विविध शहरांमध्ये स्थायिक करण्याचं कट रचत आहेत.

बरेच बांगलादेशी घुसखोर असे आहेत जे मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच विविध रहस्य समोर येत आहेत. या घुसखोरांकडून पोलिसांना मिळणारी माहिती धक्कादायक आहे. अखेर या घुसखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, दिल्लीतही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई झाली होती. दिल्लीच्या कालिंजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार इथं घुसखोरांची शोध मोहिम सुरू होती. दिल्ली पोलिसांनी बऱ्याच घुसखोरांना पकडून पुन्हा बांगलादेशात पाठवले.

महाराष्ट्रात ज्या लोकांना पकडले, हे लोक मुंबईत गेली कित्येक वर्ष राहत होते. त्यांच्याकडे ती सगळी कागदपत्रे होती जी भारतीय नागरिकाकडे असतात परंतु हे सर्व बांगलादेशी घुसखोर असल्याचं सत्य समोर आले. आपली ओळख पटवण्यासाठी या लोकांनी जी कागदपत्रे पोलिसांना दाखवली ती सर्व बनावट असल्याचं सिद्ध झाले. त्यात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसह पासपोर्टही आहे. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांचे सिंडिकेट आहे. प्रत्येक बोगस कागदपत्रासाठी रेट ठरलेले आहेत. 

बनावट आधार कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट रेशन कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट महाराष्ट्र अधिवास - १० ते १५ हजार रुपयेबनावट पॅन कार्ड - ५ ते १० हजार रुपये

जर एखाद्या घुसखोराला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला ५० ते १ लाख रुपये द्यावे लागतात. पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. फोन रेकॉर्डमधून व्हॉट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मिडिया एप्समधून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्कात असतात. मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवली आहे. तिथेही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाल्याचं समोर आले आहे. मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनी, गणपत पाटील नगर, मालवणी, दहिसर इथल्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर सापडले. नवी मुंबईत पनवेल, नेरुळ, उरण परिसरात १२ ते १५ हजार घुसखोर आढळले आहेत. 

दरम्यान, २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी १४७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली त्यातील २१ जणांना बांगलादेशात पाठवले. मागील ३ वर्षात बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱअया ९२८ बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशी घुसखोरांचे नेटवर्क केवळ बनावट कागदपत्रे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वास्तव्य करण्यापुरते मर्यादित नाही. घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांना शोधणे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसBangladeshबांगलादेश