शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:01 IST

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले.

मुंबई - राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई झाली आहे. घुसखोरांविरोधात २ शहरांमध्ये एसआयटी तपासणी सुरू आहे. अनेकांकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाच्या चौकटीत अनेक सरकारी अधिकारी आणि नेतेही आहेत. व्होटबँकसाठी बनावट कागदपत्रे बनवले जातात. ही कागदपत्रे बनवण्यामागे मोठं रॅकेट आहे जे बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या विविध शहरांमध्ये स्थायिक करण्याचं कट रचत आहेत.

बरेच बांगलादेशी घुसखोर असे आहेत जे मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच विविध रहस्य समोर येत आहेत. या घुसखोरांकडून पोलिसांना मिळणारी माहिती धक्कादायक आहे. अखेर या घुसखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, दिल्लीतही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई झाली होती. दिल्लीच्या कालिंजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार इथं घुसखोरांची शोध मोहिम सुरू होती. दिल्ली पोलिसांनी बऱ्याच घुसखोरांना पकडून पुन्हा बांगलादेशात पाठवले.

महाराष्ट्रात ज्या लोकांना पकडले, हे लोक मुंबईत गेली कित्येक वर्ष राहत होते. त्यांच्याकडे ती सगळी कागदपत्रे होती जी भारतीय नागरिकाकडे असतात परंतु हे सर्व बांगलादेशी घुसखोर असल्याचं सत्य समोर आले. आपली ओळख पटवण्यासाठी या लोकांनी जी कागदपत्रे पोलिसांना दाखवली ती सर्व बनावट असल्याचं सिद्ध झाले. त्यात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसह पासपोर्टही आहे. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांचे सिंडिकेट आहे. प्रत्येक बोगस कागदपत्रासाठी रेट ठरलेले आहेत. 

बनावट आधार कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट रेशन कार्ड - ५ ते १० हजार रुपयेबनावट महाराष्ट्र अधिवास - १० ते १५ हजार रुपयेबनावट पॅन कार्ड - ५ ते १० हजार रुपये

जर एखाद्या घुसखोराला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला ५० ते १ लाख रुपये द्यावे लागतात. पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. फोन रेकॉर्डमधून व्हॉट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मिडिया एप्समधून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्कात असतात. मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवली आहे. तिथेही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाल्याचं समोर आले आहे. मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनी, गणपत पाटील नगर, मालवणी, दहिसर इथल्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर सापडले. नवी मुंबईत पनवेल, नेरुळ, उरण परिसरात १२ ते १५ हजार घुसखोर आढळले आहेत. 

दरम्यान, २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी १४७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली त्यातील २१ जणांना बांगलादेशात पाठवले. मागील ३ वर्षात बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱअया ९२८ बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशी घुसखोरांचे नेटवर्क केवळ बनावट कागदपत्रे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वास्तव्य करण्यापुरते मर्यादित नाही. घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांना शोधणे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसBangladeshबांगलादेश