शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसांची तीन तरुणांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू; 6 पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 10:25 IST

बाहेर गावावरुन आलेल्या तरुणांकडून खंडनी वसुल करण्यासाठी मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप.

गोरखपूर: हॉटेलमध्ये छापेमारीदरम्यान पोलिसांनी तरुणांना केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन तरुणांकडून खंडणी वसुल करण्यासाठी त्यांच्या खोलीत छापेमारी केल्याचा गोरखपूर पोलिसांवर आरोप आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोप असलेल्या 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मृत तरुणाची पत्नीने पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष, प्रदीप आणि अरविंद हे तीन तरुण गोरखपूरला आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी आले होते. सोमवारी सकाळी 8 वाजता रामगढ ताल परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये ते थांबले. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास अचानक काही पोलीस त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांची आयडी तपासल्यानंतर त्याच्या सामानाची शोधाशोध करू लागले.

खोलीत घुसून तरुणांना मारहाणयावेळी तरुणांनी पोलिसांना या छापेमारीचे कारण विचारले असता पोलिसांनी अरविंद नावाच्या तरुणाला मारहाण करत खोलीबाहेर ओढले. अरविंदने सांगितल्यानुसार, जेव्हा तो खोलीबाहेर उभा होता, तेव्हा त्याने खोलीच्या आतून मनीषला मारहाण केल्याचा आवाज ऐकला आणि पोलिस त्याला बाहेर आणत असल्याचे पाहिले. मनीषच्या चेहऱ्यातून खूप रक्तस्त्राव होतं होता. यानंतर पोलिसांनी त्याला त्यांच्या कारमध्ये बसवले आणि रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांवर वसुलीचा आरोपगोरखपूरचे रहिवासी राणा प्रताप चंद उर्फ ​​चंदन सैनी यांनी सांगितले की, तिघे त्याचे मित्र आहेत आणि त्याला भेटण्यसाठी गोरखपूरला आले होते. पण, तरुण बाहेर गावावरुन आल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्यांना खोलीत घुसून मारहाण केली, असा आरोप पोलिसांवर आहे. दरम्यान, मनीष गुप्ताच्या पत्नीने त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कानपूरहून गोरखपूर गाठले. आता पोलिसांवर खुनाचा खटला चालवण्याची मागणी मनीषच्या कुटुंबियांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसExtortionखंडणी